Yavatmal News : पावसापासून संरक्षणासाठीच्या सोयी सुविधा नसल्याच्या परिणामी मंगळवारी (ता. ९) रात्री झालल्या पावसामुळे उघड्यावरील शेतीमाल भिजत लाखो रुपयांचे नुकसान झाले. आर्णी बाजार समितीत घडलेल्या या प्रकाराविषयी शेतकऱ्यांमधून असंतोष व्यक्त होत आहे.
यवतमाळ जिल्ह्यात मंगळवारी रात्री जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यासोबतच सोसाट्याचा वाराही वाहत होता. याचा फटका भाजीपाला व फळपिकांना बसला. त्यासोबतच आर्णी बाजार समितीत उघड्यावर असलेला शेतीमालही भिजला. या भिजलेल्या शेतमालाची भरपाई आता कोण करणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
विशेष म्हणजे शेतमाल साठवणुकीसाठी बाजार समितीच्या परिसरात शेडची उभारणी करण्यात आली आहे. परंतु त्यात शेतकऱ्यांपेक्षा व्यापाऱ्यांचाच माल ठेवण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचेच अधिक नुकसान झाले. दरम्यान मार्केट यार्डामध्ये पाणी साचल्याने ते काढण्यासाठी सहा मजुरांना लावण्यात आले.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.