Agriculture Advisory : कृषी सल्ला (मराठवाडा विभाग)

Agriculture Weather : प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त अंदाजानुसार मराठवाड्यातील पुढील तीन दिवसांत आकाश स्वच्छ ते पूर्णत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे.
Indian Agriculture
Indian AgricultureAgrowon

Agriculture :

हवामान अंदाज

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त अंदाजानुसार मराठवाड्यातील पुढील तीन दिवसांत आकाश स्वच्छ ते पूर्णत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ३८.० मि.मी., बीड जिल्ह्यात ४२.० मि.मी., हिंगोली जिल्ह्यात २८.० मि.मी., जालना जिल्ह्यात २९.० मि.मी., लातूर जिल्ह्यात ३९.० मि.मी., नांदेड जिल्ह्यात ३६.० मि.मी., धाराशिव जिल्ह्यात ३३.० मि.मी., तर परभणी जिल्ह्यात ३२.० मि.मी. एकूण पावसाची शक्‍यता आहे.

कमाल तापमान ३७.० ते ४३.३ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २२.० ते २७.० अंश सेल्सिअस राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता २२-७६, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ११-५२ टक्के राहील. वाऱ्याचा वेग ताशी १०-२० किमी प्रति तास राहील.

हवामान इशारा

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार, ता. १५ मे बीड, धाराशिव व जालना जिल्ह्यात तर ता. १६ मे रोजी धाराशिव, लातूर, बीड जिल्ह्यात व ता. १७ मे रोजी धाराशिव, लातूर व नांदेड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी ४० ते ५० कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

मराठवाड्यात पुढील दोन दिवसात कमाल तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही. त्यानंतर कमाल तापमानात हळूहळू ३ ते ४ अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे.

Indian Agriculture
Agriculture Advisory : कृषी सल्ला (राहुरी विभाग)

उन्हाळी तीळ

बोंड वाढीची /काढणी

गेल्या काही दिवसांत कमाल तापमानात वाढ झाली होती. मात्र गेल्या काही दिवसात बहुतांश ठिकाणी पाऊस झालेला आहे. जिथे पाऊस झाला नाही, अशा ठिकाणी उशिरा पेरणी केलेल्या उन्हाळी तीळ पिकास जमिनीतील ओलाव्यानुसार पाण्याचे नियोजन करावे. पाणी शक्यतो सकाळी किंवा संध्याकाळी सूक्ष्म सिंचन पद्धतीने द्यावे.

वेळेवर पेरणी केलेले तीळ पीक आता अनेक ठिकाणी काढणीस तयार असेल. मॉन्सूनपूर्व पाऊस व गारपिटीचा अंदाज घेऊन शक्य तितक्या लवकर पिकाची काढणी करून घ्यावी. काढणी केल्यानंतर सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.

उन्हाळी भुईमूग

शेंगा वाढीची /काढणी

उशिरा लागवड केलेले पीक सध्या वाढीच्या अवस्थेत असेल. गेल्या काही दिवसांतील पाऊस व तापमानाचा अंदाज आणि जमिनीतील ओलावा यानुसार सिंचनाचे नियोजन करावे.

पूर्वमॉन्सून पाऊस आणि गारपिटीचा अंदाज घेऊन, काढणीइतके पक्व झालेल्या उन्हाळी भुईमूग पिकाची काढणी करावी. त्यानंतर पिकाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.

हळद

सध्या बऱ्याच ठिकाणी हळदीची काढणीची कामे सुरू आहेत. तर काही ठिकाणी पुढील हळद उकडणे, वाळवणे, पॉलिश करणे ही कामे सुरू आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. पुढेही या गारपीट आणि पावसाची शक्यता लक्षात घेता काढणी केलेल्या हळदीची उघड्यावर साठवण करू नये. काढणी केलेल्या मालाची सुरक्षित ठिकाणी (गोदामात) साठवणूक करावी.

Indian Agriculture
Weekly Weather : पूर्वमोसमी पावसाला सुरुवात; तापमानात घट

फळबाग

द्राक्ष : या बागेमध्ये घड निर्मितीसाठी एप्रिल छाटणी केली जाते. ही प्रक्रिया अनेक ठिकाणी १५ मेपर्यंत केली जात असल्याचे दिसते. ती लवकरात लवकर करून घ्यावी. त्यापेक्षा जास्त उशीर करू नये.

आंबा बाग : नवीन लागवड केलेल्या फळबागेमध्ये जमिनीतील ओलावा टिकून राहण्यासाठी व जमिनीचे तापमान संतुलित राहण्यासाठी आंबा फळझाडाच्या आळ्यात आच्छादन करावे. या उन्हाळ्यामध्ये अनेक ठिकाणी उच्च पातळीवर पोहोचत आहे. या वाढत्या उष्ण स्थितीचा विपरीत परिणाम नव्या रोपांवर होऊ नये, यासाठी रोपांभोवती आणि वरून शेडनेटने सावली करावी. आंबा फळांची काढणी सुरू असलेल्या बागेमध्ये योग्य पक्वतेला वेळेवर काढणी करावी.

केळी : कमाल तापमानात वाढ झाली असून, जमिनीतील ओलावा व तापमान संतुलित राहण्यासाठी केळी फळझाडाच्या आळ्यात आच्छादन करावे. बागेस सकाळी किंवा संध्याकाळी पाणी द्यावे. पाणी देण्यासाठी शक्यतो ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करावा. नवीन लागवड केलेल्या फळबागेमध्ये रोपांना शेडनेटच्या साह्याने सावली करावी. पाऊस आणि गारपिटीचा अंदाज लक्षात घेता, काढणीस तयार असलेल्या केळी घडांची काढणी लवकरात लवकर करून घ्यावी.

भाजीपाला

काढणी /वाढीची

काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची, कांदा, टरबूज, खरबूज इत्यादी पिकांची काढणी लवकरात लवकर करावी.

नवीन लागवड केलेल्या व लहान वेलवर्गीय झाडांना काठीने आधार द्यावा.

कमाल तापमानात वाढ होत असून, भाजीपाला पिकास आवश्यकता आणि जमिनीतील ओलाव्यानुसार सिंचनाने व्यवस्थापन द्यावे. पाणी शक्यतो सकाळी किंवा संध्याकाळी सूक्ष्म सिंचन पद्धतीने द्यावे.

मशागत :

रब्बी पिकांची काढणी झाल्यानंतर शेतात लवकरात लवकर खोल नांगरणी करून घ्यावी. कडक उन्हामुळे जमीन तापून त्यातील किडींचे कोष व रोगकारक बुरशींचा नाश होण्यास मदत मिळेल. संभाव्य हंगामासाठी शेतकऱ्यांनी आपल्या शेतामधील मातीचे माती परिक्षण करून घ्यावे.

डॉ. कैलास डाखोरे, ७५८८९९३१०५

डॉ. डी. डी. पटाईत, ७५८८०८२०४०

(मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com