SDRF Boat Accident : जीव वाचवण्यासाठी गेलेल्या SDRF च्या पथकावर काळाचा घाला; ५ जणांपैकी तिघांचा मृत्यू, दोघांचा शोध सुरु

Pravara River SDRF Boat Accident : उजनी धरणातील बोट दुर्घटना ताजी असतानाच अहमदनगर जिल्ह्यातील प्रवरा नदीत बोट बुडाल्याची घटना घडली आहे.
SDRF Boat Accident
SDRF Boat Accident Agrowon

Pune News : सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात बोट बुडाल्याची भीषण दुर्घटना ताजी असतानाच अहमदनगर जिल्ह्यात गुरूवारी (ता. २३) देखील अशीच घटना घडली आहे. यात बुधवारी बुडालेल्या दोघांचा शोध घेण्यासाठी गेलेल्या राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या जवानांच्या पथकासह एकावर काळाने घाला घातला आहे. पथकाची बोट उलटल्याने पाच जन बुडाले आहेत. यात एका स्थानक युवकाचा समावेश होता. या दुर्घटनेत एसडीआरएफच्या तीन जवानांचा मृत्यू झाला असून दोघांचा शोध घेतला जात आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील सुगाव गाव जवळील प्रवरा नदीत पोहण्यासाठी बुधवारी (ता.२२) दोन युवक गेले होते. सागर पोपट जेडगुले (वय २५ रा. धुळवड ता. सिन्नर) आणि अर्जुन रामदास जेडगुले (वय १८ रा. पेमगिरी, ता. संगमनेर) अशी यांचे नावे असून ती बुडाली. यानंतर त्यांचा शोध घेण्यासाठी एसडीआरएफच्या पथकाला गुरुवारी बोलवण्यात आले. गुरूवारी सकाळी पथकातील चार जवान आणि स्थानिक एक युवकाच्या मदतीने शोध सरू करण्यात आला होता.

SDRF Boat Accident
Ujani Dam Boat Accident : उजनी धरणातील बोट दुर्घटनेत आदिनाथ कारखान्याचे माजी चेअरमन धनंजय डोंगरेंचा मुलगा बुडाल्याची भीती

दरम्यान शोध सुरू असतानाच बोट बुडाली. ज्यात तीन जवानांचा मृत्यू झाला आहे. तसेच दोघांचा शोध घेतला जात आहे. या घटनेची माहिती मिळताच माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे घटनास्थळी दाखल झाले.

तसेच त्यांनी प्रशासानाकडून घटनेची माहिती घेतल्याची प्रांताधिकारी शैलेश कुमार हिंगे यांनी माहिती दिली. यावेळी थोरात यांनी, सध्या बोटीमधील इतर दोघांचा शोध सुरू असल्याचे म्हटले आहे. सध्या बुडालेल्या दोघांचा शोध घेण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू असल्याचेही प्रांताधिकारी हिंगे यांनी सांगितले आहे. तर आहे. या दुर्देवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

SDRF Boat Accident
Ujani Dam Boat sank : वादळी वाऱ्याचा तडाखा! भीमा नदी पात्रात उलटली बोट; ६ बेपत्ता, एनडीआरएफचे पथकाकडून शोध सुरू

उजनीत काय झाले?

दरम्यान मंगळवारी (ता.२१) सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात वादळी वाऱ्यामुळे बोट बुडाल्याची घटना घडली होती. यात ६ जण बेपत्ता झाले होते. यात एकाच कुटूंबातील चार आणि इतर दोघांचा समावेश होता. तर दुर्दैवी बाब म्हणजे यात एका वर्षाच्या बालकाचा देखील समावेश आहे.

गेल्या ३६ तासांच्या अथक शोध मोहिमेनंतर गुरूवारी (ता.२३) सकाळी एनडीआरएफच्या पथकाला पाच जणांचे मृतदेह सापडले आहेत. यामध्ये कृष्णा दत्तू जाधव (व-२८), कोमल कृष्णा जाधव (व-२५), वैभवी कृष्णा जाधव (व-२.५), समर्थ कृष्णा जाधव (व- १) यांच्यासह एकाचा मृतदेह हाती लागला आहे. तर सध्या एकाचा शोध एनडीआरएफच्या पथकाकडून घेतला जात आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com