Crop Insurance : रत्नागिरी जिल्ह्यात ९ हजार शेतकऱ्यांनी घेतला पीकविमा

Crop Insurance Scheme : प्रतिकूल हवामानापासून फळपिकाचे संरक्षण करण्यासाठी पीकविमा योजनेमध्ये काजू व आंब्याचा समावेश केला आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी ३० नोव्हेंबरपर्यंत अंतिम मुदत आहे.
Crop Insurance
Crop InsuranceAgrowon
Published on
Updated on

Ratnagiri News : प्रतिकूल हवामानापासून फळपिकाचे संरक्षण करण्यासाठी पीकविमा योजनेमध्ये काजू व आंब्याचा समावेश केला आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी ३० नोव्हेंबरपर्यंत अंतिम मुदत आहे. या योजनेत आतापर्यंत ९ हजार १९ शेतकऱ्यांनी ५ हजार २८०.८ हेक्टर क्षेत्रासाठी सहभाग नोंदवला आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुनंदा कुऱ्हाडे यांनी केले.

शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठीचा पर्याय म्हणून कृषी विभागामार्फत दरवर्षी हवामानावर आधारित फळपीक विमा योजना राबवण्यात येते. यंदाच्या आंबिया बहारासाठी योजनेत सहभागाकरिता विमा पोर्टल सुरू झाले आहे.

Crop Insurance
Fruit Crop Insurance : फळपीक विमा योजनेला थंड प्रतिसाद

अवेळी पाऊस, कमी किंवा जास्त तापमान, वेगाचा वारा, गारपीट व सापेक्ष आर्द्रता या हवामान धोक्यापासून निर्धारित केलेल्या कालावधीत सहभागी होऊन फळबागांचे संरक्षण करा. जिल्ह्यात अधिसूचित केलेल्या महसूल मंडलांत आंबा, काजू पिकांच्या उत्पादनक्षम फळबागांना विमा संरक्षण देण्यात येईल.

Crop Insurance
Crop Insurance : पीक विम्याची भरपाई २, ३ रुपये मंजूर होऊ शकते का? योजनेचा नियम काय सांगतो?

कर्जदार शेतकरी व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना योजनेतील सहभाग ऐच्छिक असेल. शेतकऱ्यांव्यतिरिक्त कुळ व भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी यांनाही योजना लागू राहील. जिल्ह्यासाठी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीमार्फत योजना राबवण्यात येत आहे. यात ९ हजार १९ शेतकऱ्यांनी ५ हजार २८०.८ हेक्टर क्षेत्रासाठी सहभाग नोंदवला. योजनेत सहभागाची अंतिम मुदत काजू व आंबा पिकांकरिता ३० नोव्हेंबर आहे.

या योजनेचा विमा हप्ता आपले सरकार सेवा केंद्र (सीएससी), बँक तसेच www.pmfby.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने भरावा तसेच अधिक माहितीसाठी गावातील कृषी सहायक किंवा कृषी विभागाशी संपर्क साधावा. तसेच विम्यासाठी फळपिकांची नोंद सात-बारा वर बंधनकारक असल्याने ई-पीक पाहणी अॅपद्वारे फळपिकांच्या नोंदीचे आवाहनही केले आहे.

चार हेक्टर क्षेत्रासाठी विमा नोंदणी

एका शेतकऱ्याला अधिसूचित फळपिकांसाठी ४ हेक्टर क्षेत्रावर विमा नोंदणी करता येईल. विमा अर्जासोबत फळबागेचा जिओ टॕगिंग असलेला फोटो विमा पोर्टलवर अपलोड करणे अनिवार्य आहे. आंबा पिकासाठी विमा संरक्षित रक्कम १ लाख ४० हजार रुपये व विमा हप्ता १३ हजार ३०० रुपये व काजू पिकासाठी विमा संरक्षित रक्कम १ लाख रुपये, विमा हप्ता ५ हजार रुपये आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com