Agriculture Department : कृषी सहायकांच्या रखडलेल्या भरतीची प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात आली आहे. येत्या १६ व १९ जानेवारीला ७८ हजार उमेदवारांच्या परीक्षा घेतल्या जाणार आहेत.
कृषी आयुक्तालयाचे वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी ज्ञानेश्वर गीते यांच्या म्हणण्यानुसार, १७४४ जागांसाठी या परीक्षा घेतल्या जात आहेत. त्यात राज्याच्या बिगर अनुसूचित क्षेत्रातील अर्थात ‘नॉन पेसा’ रिक्त जागांचा समावेश आहे.
भरतीकरिता त्या-त्या विभागातील सहसंचालकांनी अर्ज मागविले होते. यापूर्वी पद भरतीसाठी परीक्षेची प्रक्रिया कृषी विभागाकडून परीक्षा परिषदेमार्फत राबविली जात होती. परंतु, त्यात गैरव्यवहार होत असल्याच्या तक्रारी झाल्या. त्यामुळे यंदा ‘आयबीपीएस’ कंपनीमार्फत परीक्षा घेतली जात आहे. तसा करार या कंपनीशी करण्यात आलेला आहे.
या परीक्षा २०० गुणांच्या असून ऑनलाइन पद्धतीने होतील. निकाल एक महिन्यात जाहीर होणे अपेक्षित आहे. निकालानंतर न्यायालयीन वादविवाद न झाल्यास मार्चमध्ये नवे कृषी सहायक कृषी खात्यात रुजू होऊ शकतात, असे सूत्रांचे म्हणणे आहे.
हरकतींमुळे ‘पेसा’ची पदे वगळली
दरम्यान, परीक्षेसाठी ७८ हजार ६२ उमेदवारांनी अर्ज केले होते. त्यावेळी त्यांना ‘पेसा’ क्षेत्राचा पर्याय विचारण्यात आला होता.
‘पेसा’ क्षेत्रातील पदे धरुन २१०९ जागांसाठी परीक्षा घेण्याचे नियोजन होते. परंतु, ‘पेसा’च्या पदांना हरकती आलेल्या आहेत. त्यामुळे ही पदे भरतीतून वगळण्यात आलेली आहेत.
विभागनिहाय पदसंख्या अशी...
ठाणे---२४७
पुणे---१८२
नाशिक---१८९
अमरावती---१५६
छत्रपती संभाजीनगर---१९६
नागपूर---३६५
लातूर---१५९
कोल्हापूर---२५०
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.