
Dharashiv News : मागील वर्षातील खरीप हंगामातीलल पीक काढणी कव्हरअंतर्गत पीकविमा नुकसान भरपाईपासून वंचित असलेल्या ७५ हजार शेतकऱ्यांना तातडीने भरपाई द्यावी. त्यासाठी जिल्हास्तरीय समितीची बैठक आयोजित करून पीकविमा कंपनीला आदेश द्यावेत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अनिल जगताप यांनी जिल्हाधिकारी कीर्तीकिरण पुजार यांच्याकडे केली आहे.\
खरीप २०२४ मध्ये जिल्ह्यातील सात लाख १९ हजार १६७ शेतकऱ्यांनी पीकविमा भरला होता. त्यासाठी एचडीएफसी या पीकविमा कंपनीला शेतकरी हिस्सा राज्य हिस्सा व केंद्र शासनाचा हिस्सा मिळत ५९६ कोटी ९५ लाख रुपये विमा हप्ता होता.
गेल्या वर्षी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी अवकाळी पाऊस झाल्याने पिकाचे नुकसान झाले. शेतकऱ्यांनी ७२ तासांत रीतसर पूर्व सूचना कंपनीला दिल्या. त्यानंतर कंपनीने सर्वेक्षण करून पाच लाख १९ हजार ७४७ शेतकऱ्यांना आतापर्यंत २१८ कोटी आठ लाख रुपयांची भरपाई वाटप केली.
सात हजार ६९९ शेतकऱ्यांची पीकविमा नुकसान भरपाईची रक्कम एक हजार रुपयांपेक्षा कमी असल्याने राज्य शासनाकडून सबसिडी आल्यानंतर सव्वा कोटींची ही भरपाईही करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
या स्थितीत पीक काढणी कव्हरअंतर्गत (पोस्ट हार्वेस्टिंग) अद्याप ७५ हजार शेतकरी पीकविमा नुकसान भरपाई मिळण्यापासून वंचित आहेत. या शेतकऱ्यांचे अद्याप जवळपास बारा कोटी रुपये येणे बाकी आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.