Nagpur Ratnagiri Highway Survey : महामार्गात शेती गेली आता मोबदलाही कवडीमोल, शेतकऱ्यांची न्यायालयात धाव

National Highway : राज्यमार्ग, प्राधिकरण प्रभावित राज्यमार्ग आणि राष्ट्रीय महामार्गासाठी एकाच गटातील जमिनींचे तीनवेळा संपादन झाले आहे.
Nagpur Ratnagiri Highway Survey
Nagpur Ratnagiri Highway Surveyagrowon

Ratnagiri Nagpur Highway : कोल्हापूर जिल्ह्यातून नागपूर ते रत्नागिरी हा महामार्ग जात आहे दरम्यान या मार्गावर हजारो हेक्टर जमीन हस्तातरण करण्याचे काम शासनाकडून सुरू आहे. अशातच कोल्हापूर जिल्ह्यातील भुये आणि भुयेवाडी गावचे ५८ शेतकरी कुटुंबे न्यायालयात गेले आहेत. रस्त्यासाठी भूसंपादन चुकीच्या पद्धतीने रेखांकन केल्याचा त्यांनी आरोप केला आहे.

शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यमार्ग, प्राधिकरण प्रभावित राज्यमार्ग आणि राष्ट्रीय महामार्गासाठी एकाच गटातील जमिनींचे तीनवेळा संपादन झाले आहे. ताज्या रेखांकनानुसार या भागातील ३४ गटांतील दोनशे कुटुंबातील २००० शेतकऱ्यांना याला सामोरे जावे लागणार आहे. हातची जमीन तर जाणारच परंतु महामार्गाऐवजी प्राधिकरणाचा निकष लावल्याने रेडिरेकरनच्या दर कमी बसणार असल्याने बाधित शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे.

नागपूर-रत्नागिरी हा १६६ नॅशनल हायवे आणि राज्यमार्ग एसएच-१९४ च्या दुतर्फा घेऊन अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांच्या पिकाऊ जमिनी वाचविण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाकडून मागच्या महिन्याभरापूर्वी घेतला होता.

राज्यमार्ग एसएच-१९४, प्राधिकरण प्रभावित राज्यमार्ग एसएच-१९४ (४५ मीटर) आणि नागपूर-रत्नागिरी एनएच-१६६ (६० मीटर) या राष्ट्रीय महामार्गासाठी जमिनींचे तीनवेळा संपादन झाले आहे.

Nagpur Ratnagiri Highway Survey
Shaktipith Mahamarg : शक्तिपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध तरीही शासनाकडून उपविभागीय अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या

दरम्यान ३४ क्रमांकाच्या एकाच गटातील जमिनीतून ३ वेळा भूसंपादन झाले आहे. भुये आणि भुयेवाडी येथे एक किलोमीटरमध्ये सध्याचा हा प्रस्तावित राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (एनएचएआय) डिझाईन ऑफ एक्स्पर्ट कमिटीच्या शिफारशीनुसार राज्यमार्ग एसएच-१९४च्या समांतर होत आहे. दोन्ही मार्ग जवळून जाणार असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान तर होणार आहेच परंतु अनेक शेतकरी देशोधडीला जाण्याची शक्यता आहे.

भुये भुयेवाडी ही गावे प्राधिकरणात समाविष्ट केल्याने भूसंपादनाचा मोबदला ठरविताना राष्ट्रीय महामार्गाऐवजी प्राधिकरणाचा नियम लागू होणार आहे. त्यामुळे शहराजवळील या गावांना ८ ते १० लाख रुपये दर अपेक्षित असताना त्यांच्या निम्म्यानेही दर निश्चित होत नाही. याविरुद्ध संबंधित शेतकऱ्यांनी लोकप्रतिनिधींकडे दाद मागितली होती, परंतु याकडे कुणी लक्ष दिलेले नाही.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com