Crop Damage : ऑक्टोबरच्या अतिवृष्टीची ५७ हजार हेक्टरला बाधा

Heavy Rain Crop Loss : दोन्ही तालुक्यांतील ८१ हजार ९६६ शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून, या शेतकऱ्यांना भरपाई देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सरकारकडे ७८ कोटी ४१ लाख रुपये निधीची मागणी केली आहे.
Crop Damage
Crop DamageAgrowon
Published on
Updated on

Latur News : जिल्ह्यात सलग ऑक्टोबरच्या तिसऱ्या महिन्यातही अतिवृष्टीमुळे खरिपातील पिकांचे पिकांचे मोठे नुकसान झाले असून, या महिन्यात औसा व निलंगा तालुक्यांतील ५७ हजार ६५६ हेक्टवरील पिके बाधित झाले आहेत.

दोन्ही तालुक्यांतील ८१ हजार ९६६ शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून, या शेतकऱ्यांना भरपाई देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सरकारकडे ७८ कोटी ४१ लाख रुपये निधीची मागणी केली आहे.

जिल्ह्यात ऑगस्टपासून अतिवृष्टीचा फटका पिकांना बसत आहे. ऐन काढणीच्या वेळी मूग व उडीद पिकांचे तर सप्टेंबरमध्ये सोयाबीनसह फळपिकांचे अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात ऑगस्टमध्ये ३२६ शेतकऱ्यांच्या १५५ हेक्टरवरील पिकांना बाधा झाली होती. या बाधित शेतकऱ्यांना सरकारने दोन कोटी एक लाख आठ हजार रुपये भरपाई मंजूर केली.

Crop Damage
Cotton Crop Damage : मालेगाव तालुक्यात कपाशीचे नुकसान

सप्टेंबरमधील अतिवृष्टीचा मोठा फटका पिकांना बसला. यात सोयाबीनचे पीक अतिवृष्टीच्या तडाक्यात सापडले. ऐन काढणीच्या वेळीच अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून नेला. या महिन्यात दोन लाख ८२ हजार ४५८ हेक्टवरील पिके बाधित झाले.

त्यानतंर तीन लाख ५८ हजार ७६७ शेतकऱ्यांना ३८४ कोटी १४ लाख रुपयाची भरपाई सरकारने चार दिवसात मंजूर केली. मात्र अजून ही भरपाईची रक्कम हातात आली नसताना ऑक्टोबरमधील अतिवृष्टी झाली आहे. यामुळे निलंगा तालुक्यातील ६० हजार ९१३ शेतकऱ्यांच्या ३८ हजार हेक्टरवरील पिकांचे, तर औसा तालुक्यातील २१ हजार ५३ शेतकऱ्यांचे १९ हजार ६५६ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.

Crop Damage
Crop Damage : मराठवाड्यात नुकसानीचे क्षेत्र २ लाख २९ हजार हेक्टरवर

दोन ते तीन हेक्टवरील पिकांचे नुकसान झालेले क्षेत्र आठ हजार ५०३ हेक्टर आहे. सर्व नुकसानीचे पंचनामे प्रशासनाने पूर्ण केले असून, ३३ टक्क्यांहून अधिक नुकसानीची भरपाई देण्यासाठी सरकारकडे निधीची मागणी केली आहे. सध्या विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता असून हा निधी सरकारकडून मंजूर होणार की नाही, असा प्रश्‍न शेतकऱ्यांना पडला आहे.

धाराशिवला ६३ हजार हेक्टवरील पिके बाधित

धाराशिव जिल्ह्यात ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे उमरगा व लोहारा तालुक्यातील पिके बाधित झाली असून, या दोन्ही तालुक्यातील १३० गावांतील ७९ हजार ८८० शेतकऱ्यांच्या ६३ हजार ५७६ हेक्टवरील पिके बाधित झाली आहे. या नुकसानीची भरपाई देण्यासाठी प्रशासनाने पंचनामे सुरू केले असून, अहवाल येताच भरपाईसाठी सरकारकडे निधीची मागणी केली जाणार आहे. अतिवृष्टीमुळे १३२ कच्चा घरांचे, २८ झोपड्यांचे, तर वीस गोठ्यांचेही नुकसान झाले आहे. दरम्यान सप्टेंबरमधील अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना भरपाईसाठी निधीची मागणी करण्यात आली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com