
Satara News: गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी प्रमुख धरणात पुरेसा पाणीसाठा असून, सध्या सिंचनासाठी दुष्काळी भागाला पिण्यासाठी सर्वच धरणांतून पाणी सोडण्यात येत आहे. यामध्ये कोयनेतून २१००, धोम ११७५, धोम- बलकवडी ३४०, कण्हेर ४२५, उरमोडी ५७०, तारळी २२० क्युसेक पाणी सोडले आहे. आगामी काळात पाणी नियोजन करण्यासाठी सातारा सिंचन मंडळाने आतापासूनच पाणी मागणी करण्याचे आवाहन उपसा सिंचन योजना व शेतकऱ्यांना केले आहे.
या वर्षी पावसाचे प्रमाण जेमतेम राहिल्यामुळे प्रमुख धरणात अद्यापपर्यंत तरी पुरेसा पाणीसाठा उपलब्ध आहे. गेल्या वर्षी मार्चमध्ये बहुतांशी धरणांनी तळ गाठला होता. कोयना, धोम व धोम-बलकवडी धरणांतून मार्चमध्ये सिंचनासाठी पाणी सोडले जात होते. हे पाणी दुष्काळी भागासह पिण्याच्या पाण्यासाठी सोडले जात होते.
या वर्षी सर्वच प्रमुख धरणांत पुरेसा पाणीसाठा आहे. साधारण ६० ते ७५ टक्क्यांपर्यंत पाणी उपलब्ध आहे. सध्या कोयना, धोम, धोम-बलकवडी, कण्हेर, उरमोडी, तारळी या धरणातून सिंचनासाठी पाणी सोडले आहे.
यामध्ये कोयनेतून २१००, धोम ११७५, धोम- बलकवडी ३४०, कण्हेर ४२५, उरमोडी ५७०, तारळी २२० क्युसेक पाणी सोडलेले आहे. यापैकी काही पाणी हे दुष्काळी भागासाठी सोडण्यात येत आहे; पण सध्या सधन तालुक्यांतूनही धरणातील पाणी उपलब्ध करण्याची मागणी जोर धरत आहे. त्यामुळे सातारा सिंचन मंडळाने पाणी आवर्तनांचे नियोजन करण्यासाठी पाणी मागणी करण्याचे आवाहन केले आहे.
प्रमुख धरणांतील पाणीसाठा टीएमसी (कंसात टक्केवारी)
कोयना ७५.७६ (७१.५०), धोम ८.६६ (६४.१३), धोम- बलकवडी : २.३२ (५६.९२), कण्हेर ७.०४ (६९.७०), उरमोडी ७.४१ (७४.३८), तारळी ३.३२ (५६.७३), येरळवाडी ०.६८ (५९.९४).
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.