
Kolhapur News: शासनाने लोकसहभागातून अतिक्रमणमुक्त पाणंद रस्त्याची मोहीम हाती घेतली आहे. यातून चार महिन्यांत जिल्ह्यातील ४३० पाणंद रस्ते अतिक्रमणमुक्त झाले आहेत. याचा सुमारे ३७ हजार ५४ शेतकऱ्यांना शेती कामासाठी लाभ होणार आहे. शेतकरी व ग्रामस्थांच्या लोकसहभागामुळे सुमारे आठ कोटींचे काम झाले आहे. या मोहिमेतून ५९ टक्के अतिक्रमणमुक्त पाणंद रस्त्यांचे काम झाले. अद्याप ३९८ पाणंद रस्त्यांचे अतिक्रमणमुक्त करणे काम शिल्लक आहे.
शासनाने १८ फेब्रुवारीपासून अतिक्रमणमुक्त पाणंद रस्त्याची मोहीम सुरू केली आहे. सुरुवातीच्या टप्प्यात काही गावात ग्रामस्थांचा अल्प प्रतिसाद होता. इतर गावांत पाणंद रस्ते अतिक्रमणमुक्त झाल्याच्या वस्तुस्थितीनंतर प्रत्येक गावात रस्ते अतिक्रमणमुक्त करण्यासाठी ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी सहभाग घेण्यास सुरुवात केली.
काही गावांत नकाशावर ४० फुटांची पाणंद दिसतात. मात्र प्रत्यक्षात दहा ते बारा फूट पाणंद रस्ता शिल्लक राहिले आहेत. तर काही ठिकाणी शेत रस्ते, पाणंद रस्तेच गायब झाले आहेत. परिणामी उसाची, शेतीमालाची वाहतूक करणे, शेती करण्यासाठी अडचणी येऊ लागल्या आणि अनेक गावांच्या ठिकाणी वादामुळे लागवडयोग्य शेतजमीन पडीक झाली आहे.
आता रस्ते अतिक्रमणमुक्त झाल्याने शेती लागवडीखाली येऊन शेतकऱ्यांच्या विकासाला चालना मिळणार आहे. अतिक्रमणमुक्त पाणंद मोहिमेमध्ये सर्वाधिक करवीर तालुक्यात ८३ पाणंद अतिक्रमणमुक्त झाल्याने सुमारे आठ हजार चारशे शेतकऱ्यांना या रस्त्याचा लाभ होणार आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.