
Mumbai News : अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे राज्यात फेब्रुवारी २०२५ ते मे २०२५ या कालावधीत झालेल्या नुकसानीपोटी ३३७ कोटी ४१ लाख ५३ हजार रुपयांची नुकसान मदत निधीस मदत व पुनर्वसन विभागाने मान्यता दिली आहे.
फेब्रुवारी ते मे या काळात नुकसानीमुळे ३ लाख ९८ हजार ६०३ बाधित शेतकऱ्यांच्या १ लाख ८७ हजार ५३.२१ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले होते. या कालावधीत गारपिटीमुळे छत्रपती संभाजीनगर विभागामधील ६७ हजार ४६२ शेतकऱ्यांच्या ३४ हजार ५४२.४६ हेक्टर बाधित क्षेत्रावरील पिकांसाठी ५९ कोटी ९८ लाख २० हजार रुपये.
पुणे विभागातील १ लाख ७ हजार ४६३ शेतकऱ्यांच्या ४५ हजार १२८.८८ हेक्टर बाधित क्षेत्रावरील पिकांसाठी ८१ कोटी २७ लाख २७ हजार रुपये. नाशिक विभागातील १ लाख ५ हजार १४७ शेतकऱ्यांच्या ४५ हजार ९३५.१६ हेक्टर बाधित क्षेत्रावरील पिकांसाठी ८५ कोटी ६७ लाख ८ हजार रुपये. कोकण विभागातील १३ हजार ६०८ शेतकऱ्यांच्या ४ हजार ४७३.६९ हेक्टर बाधित क्षेत्रावरील पिकांसाठी ९ कोटी ३८ लाख २४ हजार रुपये.
तर, अमरावती विभागातील ५४ हजार ७२९ शेतकऱ्यांच्या ३६ हजार १८९.८६ हेक्टर बाधित क्षेत्रावरील पिकांसाठी ६६ कोटी १९ लाख ११ हजार रुपये. नागपूर विभागातील ५० हजार १९४ शेतकऱ्यांच्या २० हजार ७८३.१६ हेक्टर बाधित क्षेत्रावरील पिकांसाठी ३४ कोटी ९१ लाख ६३ हजार रुपये मदत वितरित करण्यात येणार आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.