Water Supply : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ धरणांत २८.९३ टक्के पाणीसाठा; जुलैपर्यंत पाणी पुरणार

Mumbai Water shortage : राज्यातील पाणी संकट गडद होत असून मुंबईकरांची चिंता देखील वाढली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणातील पाणीसाठा फक्त २८.९३ टक्के उरला असून महापालिका प्रशासनाने पाणी कपातीवरून कोणतेच संकेत दिलेले नाहीत. मात्र पाणी जपून वापरा असे आवाहन केले आहे.
Mumbai Water Supply
Mumbai Water SupplyAgrowon
Published on
Updated on

Pune : राज्यात गेल्या वर्षी पाऊस कमी झाल्याने यंदा भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. दरम्यान मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमधील पाणीसाठा घटत चालला आहे. या सातही धरणांमध्ये गुरूवारी (ता. ०४) पाणीसाठा २८.९३ टक्के शिल्लक राहिल्याने मुंबईकरांची चिंता वाढली होती. परिणामी पाणीकपात होण्याची शक्यता वर्तवली जात होती. यावरून मुंबई महापालिका प्रशासनाने पाणी कपातीचे कोणतेही संकेत दिले नाहीत. मात्र पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले आहे. 

उन्हाच्या तीव्र झळा बसत असून एप्रिलच्या सुरूवातीलाच मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांच्या पाणीसाठ्यात घट झाली आहे. मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, मोडक सागर, विहार, भातसा, तानसा आणि तुळशी धरणात २८.९३ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. 

Mumbai Water Supply
Water shortage : पाणी, चारा टंचाईवर मात करण्यासाठी नाशिक जिल्हा प्रशासनाकडून टंचाई नियंत्रण कक्ष सुरू 

यादरम्यान मुंबईची पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेऊन राज्य सरकारने २ लाख ३० हजार दशलक्ष लिटर पाण्याची आधीच सोय केली आहे. हे पाणी राखीव साठ्यातून देण्यात आला आहे. गुरूवारी या सात धरणात एकूण पाणीसाठा ४ लाख १८ हजार ७२१ दशलक्ष लिटर आहे. तर सध्या उपलब्ध असणारा पाणीसाठा जुलै अखेरपर्यंत मुंबईसाठी पुरेसा आहे. तरीही मुंबईकरांनी सध्याची स्थिती पाहता पाणी जपून वापरावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे. तसेच मे महिन्यात धरणातील पाणीसाठ्याचा आढावा घेतल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल, असेही प्रशासनाने म्हटले आहे. 

मुंबईला मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, मोडक सागर, विहार, भातसा, तानसा आणि तुळशी धरणातून रोज ३,९५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. मात्र गेल्या वर्षी कमी पडलेल्या पावसामुळे यंदा पाण्यासाठी अप्पर वैतरणा व भातसा धरणातून पाणी मिळावे अशी मागणी मुंबई महापालिकेच्या जल विभागाने राज्य शासनाकडे केली आहे. याप्रमाणे महापालिकेला २ लाख ३० हजार दशलक्ष लिटर राखीव पाणीसाठा उपलब्ध करून देण्यात आला आहे. यामुळे जुलै अखेरपर्यंत मुंबईला मुबलक पाणी मिळणार असून पाणी कपातीचा सध्या कोणताच विचार नसल्याचे मुंबई महापालिका प्रशासनाने म्हटले आहे. 

Mumbai Water Supply
Mumbai Municipality : मुंबईकरांना दिलासा!, येत्‍या पावसाळयापर्यंत मिळणार पाणी; महापालिकेचा निर्णय

धरणांतील साठा (दशलक्ष लिटर)

अप्पर वैतरणा - ८८,२०६

मोडक सागर - ३१,३०४

तानसा - ६१,९३४

धरणांतील साठा (दशलक्ष लिटर)

मध्य वैतरणा - २५,३०३

भातसा - १,९७,३२१

विहार - ११,२९२

तुळशी - ३६,३१

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com