Pen News : तालुक्यातील खारेपाट विभाग अनेक वर्षांपासून पिण्याच्या पाणीटंचाईला सामोरे जात आहे. २०२४ -२५ वर्षात पाणीटंचाई निवारण आराखड्यात दोन कोटी १५ लाखांची तरतूद करण्यात आली आहे. खारेपाटातील ५४ गावांसह १८९ वाड्यांसाठी पेण पंचायत समितीने केवळ चार टँकर सुरू केल्याने पाणीटंचाईची कशी दूर होणार, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
तालुक्यातील सरेभाग, मसद, शिर्कीचाळ नंबर १ यामधील खारेपाट विभागातील वाशी, वढाव, भाल, काळेश्री, विठ्ठलवाडी, बोर्झे लाखोले, बहिराम कोटक, तामसीबंदर, तुकाराम वाडी, कान्होबा या गावांसह बळवली ग्रामपंचायत हद्दीतील दर्गावाडी निगडावाडी, भेंडीवाडी येथील अनेक वाड्या-वस्त्या पाणी टंचाईला सामोरे जात आहेत.
टंचाईग्रस्त भागातील नागरिकांना पाणीपुरवठा करण्यासाठी पेण पंचायत समितीने दोन कोटी १५ लाखांचा आराखडा तयार केला आहे. आराखड्यानुसार सरकारकडे सात टँकरची मागणी करण्यात आली होती, सहा टँकर उपलब्ध झाले असून यातील चार टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू करण्यात आला आहे; तर यातील दोन टँकरला अद्याप परवानगी नाही. खारेपाटातील ५४ गावांसह १८९ वाड्या-वस्त्यांना केवळ चारच टँकरने पाणीपुरवठा करण्यात आल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.