Maharashtra Budget 2025: शेतकऱ्यांसाठी अर्थसंकल्पातील महत्वाच्या १० घोषणा; कर्जमाफी, भावांतर, नमोच्या निधीत वाढ, शेतकऱ्यांना नेमकं काय मिळालं?
Pune News: राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात कर्जमाफी, भावांतर योजना, नमो शेतकरी सन्मान निधीत वाढ, अनुदानात वाढीची अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र सरकारने शेतकऱ्यांची पुरती निराशा केली आहे. मात्र सरकारने शेतीसाठी काही महत्वाच्या घोषणा केल्या आहेत.
शेतीसाठी महत्वाच्या घोषणा
१. शेतकऱ्यांना दिवसा विश्वासार्ह वीज पुरवठा करणे शक्य व्हावे, यासाठी २७ जिल्ह्यांमध्ये मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० राबविणार
२. बी बियाणे, यंत्रसामुग्री, खते आणि शेतमालाच्या वाहतूकीसाठी "बळीराजा शेत व पाणंद रस्ते" ही नवी योजना सुरू करणार
३. कृत्रिम बुध्दिमत्ता तंत्रज्ञानाचा शेतीक्षेत्रात वापर करणार. पहिल्या टप्प्यात ५० हजार शेतकऱ्यांच्या एक लाख एकर क्षेत्राला फायदा होणार, दोन वर्षांसाठी ५०० कोटी रुपयांचा निधी देण्यात
४. बांबू आधारित उद्योगांना चालना देण्यासाठी राज्यात ४ हजार ३०० कोटी रुपये किमतीचा बांबू लागवड प्रकल्प राबविणार
५. मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेअंतर्गत ७.५ अश्वशक्ती पर्यंतच्या ४५ लाख कृषी पंपांना मोफत वीज
६. राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियानांतर्गत २ लाख १३ हजार ६२५ लाभार्थी शेतकऱ्यांना येत्या दोन वर्षांसाठी २५५ कोटी रुपयांचा निधी देणार
७. नगरपालिका क्षेत्रांतील सांडपाण्यावर प्रक्रियेचा ८ हजार २०० कोटी रुपये किंमतीचा प्रकल्प हाती घेणार
८. महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रमाअंतर्गत कालवे वितरण प्रणालीतील सुधारणेची सुमारे ५ हजार ३६ कोटी रुपये किमतीची कामे मंजूर
९. जलयुक्त शिवार अभियान २.० अंतर्गत ५ हजार ८१८ गावांमध्ये ४ हजार २२७ कोटी रुपये किंमतीची एकूण १ लाख ४८ हजार ८८८ कामे हाती घेणार. अभियानातील सर्व कामे मार्च, २०२६ पर्यंत पूर्ण करणार.
१०. गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार योजना कायमस्वरुपी राबविणार
११. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा दुसरा टप्पा २१ जिल्ह्यांतील ७ हजार २०१ गावांमध्ये राबविण्यात येणार आहे. त्यासाठी ३५१ कोटी ४२ लाख रुपये खर्च होणार
१२. वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पास तत्वतः मान्यता. अंदाजित किंमत ८८ हजार ५७४ कोटी रुपये. लाभक्षेत्र ३ लाख ७१ हजार २७७ हेक्टर.
१३. नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्पाव्दारे नाशिक व जळगाव जिल्हयातील ४९ हजार ५१६ हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ. प्रकल्पाची अंदाजित किंमत ७ हजार ५०० कोटी रूपये.
१४. दमणगंगा-एकदरे-गोदावरी या २ हजार ३०० कोटी रूपये किंमतीच्या नदीजोड प्रकल्पामुळे ३.५५ टीएमसी पाणी उपलब्ध होणार
१५. तापी महापुनर्भरण हा १९ हजार ३०० कोटी रुपये किंमतीचा सिंचन-उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम विदर्भातील खारपाण पट्ट्यातील शेतकऱ्यांना लाभ
१६. कोकणातील उल्हास आणि वैतरणा नद्यांच्या खोऱ्यातून ५४.७० टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्याचा प्रकल्प हाती घेण्यात येणार, मराठवाड्यातील सुमारे २ लाख ४० हजार हेक्टर क्षेत्राच्या सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार
१७. सांगली जिल्ह्यातील २०० मेगावॅट क्षमतेच्या म्हैसाळ उपसा सिंचन योजना-१ हजार ५९४ कोटी रुपये किंमतीच्या सौरऊर्जा प्रकल्पास मान्यता
१७. गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पातून डिसेंबर २०२४ अखेर १२ हजार ३३२ हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होणार. प्रकल्प जून २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन
१८. ३८ उदंचन जलविद्युत प्रकल्पांसाठी सामंजस्य करार २.९५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होणार, यातून ९० हजार रोजगार निर्मिती होईल.
१९. आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष-२०२५- राज्यात विविध कार्यक्रम, महोत्सव आयोजित करण्यास पुरेसा निधी उपलब्ध देणार
२०. २१०० कोटी रुपये किंमतीचा मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन-स्मार्ट प्रकल्प राबविणार
२१. राज्य शाश्वत व उच्च मूल्य असलेल्या कृषी व्यवसायाचे केंद्र व्हावे यासाठी "महाराष्ट्र अॅग्रीबिझनेस नेटवर्क-मॅग्नेट २.०" हा २१०० कोटी रुपयांचा प्रकल्प राबविणार
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.