
Parbhani News : सतत कमीत कमी तीन वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त काळ ऊसतोडीचे काम केलेल्या ऊसतोड कामगारांनी गावच्या ग्रामसेवकाकडे ऊसतोड कामगार नोंदणी अर्ज भरून ओळखपत्र प्राप्त करून घ्यावे, असे आवाहन समाजकल्याण सहायक आयुक्त गीता गुठे यांनी केले.
ऊसतोड कामगारांशी प्रत्यक्ष संवाद साधण्यासाठी व त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी सहायक आयुक्त समाजकल्याण, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ऊसतोड कामगारांसाठी पुनरागमन शिबिर ऊसतोड कामगारांना ओळखपत्र वाटप कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन सभागृह येथे घेण्यात आले या वेळी त्या बोलत होत्या.
प्रादेशिक समाजकल्याण उपायुक्त जयश्री सोनकवडे यांच्या अध्यक्षस्थानी होत्या. गटविकास अधिकारी पीयूष केंद्रेकर, नंदिनी पानपट्टे, अनिता आसेवार, जिल्हा परिषद समाज कल्याण अधिकारी शिवानंद मिनगिरे, समाजकल्याण अधिकारी अमित घवले यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते सुरेश गौतम हातागळे, सिद्धार्थ तुपसमुद्रे, प्रकाश हातागळे, नाना हातागळे, मुंजा सावळी, संतोष हातागळे (सर्व रा. वडगाव सुक्रे, ता. परभणी) या सहा ऊसतोड कामगारांना प्रातिनिधिक स्वरूपात ओळखपत्रांचे वाटप करण्यात आले.
तसेच वडगाव सुक्रे येथील ५९ ऊसतोड कामगारांना प्राधान्याने ओळखपत्र वाटप करणाऱ्या ग्रामसेविका जी. बी. काळे यांचा सोनकवडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच शाहीर काशिनाथ उबाळे यांच्या पथकाचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.