
Amravati News : ‘‘गुजरात आणि त्यांनतर गुवाहाटीच्या बंडात सहभागावेळी आम्हाला देखील मंत्रिपद मिळेल, असे सांगण्यात आले होते. नुकत्याच झालेल्या खातेवाटपानंतर आम्ही मंत्रालयाच्या नेटवर्क बाहेर आहोत हे कळून चुकले आहे.
आमच्या या पाऊल वाटेवर रेंजच नसल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कॉल लागत नसावा. त्यामुळेच भविष्याचा विचार करून मुखमंत्र्यांशी चर्चा करून पुढील निर्णय घेऊ,’’ असे आमदार बच्चू कडू यांनी सांगितले.
कडू म्हणाले, ‘‘निधी वाटपावरून नाराज असल्याने या बंडात सहभागी झालो. परंतु आता अजित पवार यांना अर्थमंत्री पद मिळाल्याने पुन्हा तेच दिवस येतील की काय, अशी भीती आहे. शिवसेना आमदारांना २५ लाख तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना ९० लाख असा निधी वाटपाचा असमतोल होता.
त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसला क्रिम खाती मिळाली आहेत. त्यातूनच ते दबाव टाकण्यात यशस्वी झाल्याचे सिद्ध होते. मात्र मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांचा वॉच राहिल्यास हा असमतोल राहणार नाही, असे वाटते.
बंडात सहभागी अपक्षांना देखील मंत्रिपद मिळेल, असे सांगण्यात आले होते. आता त्याचीही कोणतीच शाश्वती उरली नाही.’’
‘‘गेल्या पाच वर्षांत अशा घडामोडी कधी अनुभवल्या नाहीत. मंत्रिमंडळ विस्तार रखडत ठेवण्यामागे राष्ट्रवादी कॉंग्रेस होती, हे देखील स्पष्ट झाले. राष्ट्रवादी भाजपसोबत येणार हे आधीच माहिती असल्याने मंत्रिमंडळ विस्तार रखडविला’’, असेही कडू म्हणाले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.