Rabi Irrigation : ‘चासकमान’मधून सोडलेले आवर्तन ६३ दिवसानंतरही सुरूच

तालुक्यासह शिरूर तालुक्याचे नंदनवन करणाऱ्या चासकमान (ता. खेड) धरणातून रब्बी हंगामासाठी पहिले आवर्तन २२ डिसेंबरपासून सोडण्यास सुरवात झाली होती, मात्र तब्बल ६३ दिवसानंतरही हे आवर्तन सुरू आहे.
Rabi Irrigation
Rabi IrrigationAgrowon

Agriculture Irrigation चास, ता. खेड ः तालुक्यासह शिरूर तालुक्याचे नंदनवन करणाऱ्या चासकमान (Chaskaman Dam) (ता. खेड) धरणातून रब्बी हंगामासाठी (Rabi Season) पहिले आवर्तन २२ डिसेंबरपासून सोडण्यास सुरवात झाली होती, मात्र तब्बल ६३ दिवसानंतरही हे आवर्तन सुरू आहे.

धरणात सद्यःस्थितीत ५७.५८ टक्के (४.३६ टीएमसी) पाणीसाठा (Water Stock) शिल्लक राहिला आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे.

त्यामुळे पाणलोट क्षेत्रात पाणीटंचाईची (Water Shoortage) चर्चा सुरू झाली आहे. सोडण्यात येत असलेले आवर्तन थांबवून पुढील आवर्तनाबाबत नियोजन करणे गरजेचे झाले आहे.

Rabi Irrigation
Rabi Irrigation : खानदेशातील जलसाठा ५४ टक्क्यांवर स्थिर

८.५३ टीएमसी पाणीक्षमता असलेल्या चासकमान धरण परिसरात चालू वर्षी पावसाळा लांबल्याने डिसेंबर महिना संपत आला तरी धरणातून आवर्तनाची मागणी शेतकऱ्यांकडून झालेली नव्हती.

मात्र, खेड तालुक्यासह शिरूर तालुक्याच्या काही भागात सुरू झालेल्या कांदा लागवडीबरोबरच अन्य पिकांच्या लागवडीसाठी पाण्याची मागणी करण्यात आल्याने चासकमान पाटबंधारे विभागाच्या वतीने वरिष्ठांच्या आदेशाने २२ डिसेंबर रोजी धरणातून आवर्तन सोडण्यास सुरुवात झाली.

हे आवर्तन शेतकऱ्यांच्या मागणीनुसार सुरू असून, शेतकऱ्यांच्या मागणीवरूनच आवर्तनाचा कालावधी ठरणार असल्याचे धरण प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले होते.

Rabi Irrigation
Agricultural Irrigation : आर्थिक स्वरूपात मोजू पाण्याची उत्पादकता

आवर्तन सोडतेवेळी धरणात ९४.४६ टक्के म्हणजेच ८.१२ टीएमसी पाणीसाठा शिल्लक होता. मात्र, आवर्तन सुरू झाल्यावर ६३ दिवसांनंतर तो ५७.५८ झाला.

त्यामुळे पावसाळा सुरू होऊन धरणात पाणीसाठा सुरुवात होण्यास, तब्बल चार महिन्यांचा कालावधी असून, पहिल्याच आवर्तनात जवळपास ३७ टक्के पाणीसाठा कमी झाला असून, धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झपाट्याने पाणीसाठा कमी होतो आहे.

दरम्यान, उन्हाळा आतापासूनच तीव्रतेने सुरू असल्याने चालू वर्षी उन्हाच्या तीव्र झळा बसण्याचे संकेत असून, धरणातून अमर्यादपणे पाणी सोडल्याने धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाण्याचे दुर्भिक्ष जाणवणार आहे.

शेतीच्या पाण्याबरोबरच जनावरांसाठी व माणसांना पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवणार आहे. त्यामुळे नियोजन करून धरणातून पाणी सोडणे गरजेचे झाले आहे.

शिरूर तालुक्यात पाण्याची मागणी मोठी असून, पाणी सोडण्यात येत आहे. चासकमान धरणातून सुरू असणारे आवर्तन २८ फेब्रुवारीपर्यंत किंवा एक-दोन दिवस पुढेमागे बंद करण्यात येईल.

- डी. एस. डिग्गीकर, उपअभियंता, चासकमान धरण

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com