Water Crisis : नेटवर्क आले, पाणी ‘नॉट रिचेबल’

Water Shortage : वाशी आणि तळाघर ग्रामपंचायतीतील गावांत तर हंडाभर पाण्यासाठी ग्रामस्थांना चार ते पाच किलोमीटरची पायपीट करावी लागते.
Water Crisis
Water Crisis Agrowon
Published on
Updated on

Roha News : तालुक्‍यातील अनेक गावांत तीन-चार महिन्यांपासून पिण्याच्या पाण्याची भीषण समस्‍या निर्माण झाली आहे. वाशी आणि तळाघर ग्रामपंचायतीतील गावांत तर हंडाभर पाण्यासाठी ग्रामस्थांना चार ते पाच किलोमीटरची पायपीट करावी लागते.

काहीजण रोख पैसे मोजून दुचाकीवरून शहरातून पाणी आणत आहेत. त्यामुळे फायजीचे नेटवर्क मिळाले पण पिण्याचे पाणी नॉट रिचेबल झाल्‍याची अवस्‍था ग्रामीण भागांत आहे.

तीव्र पाणीटंचाईने होरपळणाऱ्या वाशी आणि तळाघर ग्रामपंचायतीमध्ये सध्या टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. मात्र ते पाणी ना पिण्यासाठी पुरत ना दैनंदिन वापरासाठी.

Water Crisis
Water Shortage : भूगर्भातील पाणी पातळी खालावली

दोन गावांमध्ये धाटाव एमआरडीसीने ५० एमएमचे केवळ एक कनेक्शन दिले आहे, मात्र ग्रामपंचायतीतील सहा गावे आणि काही वाड्यांसाठी हा पाणीपुरवठा अत्‍यल्‍प असल्‍याने टंचाईच्या झळा सोसाव्या लागतात.

वाशी ग्रामपंचायतीमधील अंतर गावासाठी ६४ लाख रुपये खर्चून जलजीवन मिशनअंतर्गत योजनेचे काम सुरू करण्यात आले, मात्र त्‍याची रखडपट्टी सुरू आहे. योजनेचे काम मंजूर अंदाजपत्रकाप्रमाणे लवकरात लवकर व्हावे, अशी मागणी ग्रामस्थांनी तहसीलदाराकडे केली आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष होत असल्‍याने गावांत पाणीबाणी निर्माण झाली आहे.

Water Crisis
Water Shortage : पुणेकरांनो पाणी जपून वापरा, १८ धरणांनी गाठला तळ

तहसील कार्यालयासमोर उपोषण

तळाघर ग्रामपंचायत हद्दीतील गावांचीदेखील हीच अवस्था असून वैशालीनगर, बौद्धवाडीला तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. जलजीवन मिशन योजनेच्या कामासाठी सरकारने कोट्यवधींचा निधी खर्च केला, परंतु निकृष्ट दर्जाच्या जलवाहिन्या टाकल्याने ही योजना रखडली आहे, असा आरोप संघर्ष समितीचे अध्यक्ष संदेश गायकवाड यांनी केला.

याविरोधात आवाज उठवल्यानंतर तत्कालीन तहसीलदार कविता जाधव यांनी दोन तास पाणी देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र हे आश्वासनदेखील हवेत विरल्‍याने संतप्त गावकऱ्यांनी गुरुवारपासून बेमुदत उपोषण सुरू केले.

रोह्यातील अनेक गावांत राबवलेल्या कोट्यवधींच्या पाणी योजना अल्पावधीतच बंद पडल्या. कामाचा निकृष्‍ट दर्जा, तर काही ठिकाणी नियोजनाअभावी योजनांची रखडपट्टी सुरू आहे.
- समीर शेडगे, तालुकाप्रमुख, ठाकरे गट
योजना मुदतीत पूर्ण करण्याचे प्रयत्‍न सुरू आहेत. एमआयडीसीकडील पाणी साठवण्याकरिता जिल्‍हा परिषदेमार्फत एक लाख लिटर क्षमतेतच्या साठवण टाकीचे काम अंतिम टप्प्यात आहे. १४ जूनपासून तळाघर, बौद्धवाडी, वैशालीनगरमध्ये पाणी पुरवण्यात येत आहे.
- बाळासाहेब भोगे, गट विकास अधिकारी, रोहा पंचायत समिती

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com