
Jalgaon News : पावसाळ्याचे तीन महिने उलटत आले, तरी पन्नास टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांत आहे. आगामी काळात पाऊस पडेल किंवा नाही हे सांगता येत नसल्याने जिल्हा प्रशासनाने आगामी काळातील दक्षता म्हणून महापालिका, पालिका, नगर परिषदांना पाणी कपातीचे आदेश दिले आहेत. पावसाळा असूनही निम्म्या जिल्ह्यात चार ते बारा दिवसांआड पाणीपुरवठा केला जात आहे.
जिल्ह्यात भुसावळ पट्ट्यातील रावेर तालुक्यात गंगापूर, सुकी, मंगरूळ, मोर (यावल) ही मध्यम प्रकल्प व पाझर तलाव फुल्ल भरले आहेत. यामुळे या दोन तालुक्यांना पाणीटंचाईचा धोका नाही. विशेष म्हणजे या तालुक्यांत उन्हाळ्यात टँकरही लागत नसल्याचे चित्र आहे. भुसावळ शहराला तापी नदीतून पाणीपुरवठा होतो. जी गावाजवळून वाहते.
चोवीस तास नदीला पाणी असते. मात्र पालिकेच्या भोंगळ कारभाराने नागरिकांना दहा ते बारा दिवसांआड पाणीपुरवठा होतो. उन्हाळ्यातही बारा ते पंधरा दिवसांआड पाणीपुरवठा केला जात होता. पाण्याबाबत भुसावळकरांना उन्हाळा आणि पावसाळा सारखाच आहे.
तापी नदी असताना भुसावळात अडचणी
भुसावळ शहराला पावसाळ्यातही दहा ते बारा दिवसांआड पाणीपुरवठा होतोय. वास्तविक तापी नदी भुसावळजवळून जाते. नदीपात्रातूनच पाणी उचलून ते शुद्ध करून नागरिकांना पुरविले जाते. सध्या नदीतून पाणी वाहून जाते. मात्र भुसावळकरांना दहा ते बारा दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो. भुसावळला हतनूर धरण आहे. त्यातूनच तापीत पाणी सोडले जाते.
जिल्ह्यात होणारा पाणीपुरवठा असा...
गाव दिवसाआड
जळगाव ४
भुसावळ १० ते १२
बोदवड १०
रावेर १
यावल १
सावदा १
मुक्ताईनगर १
पाचोरा ४
भडगाव ३
चाळीसगाव ४
अमळनेर ४
चोपडा ४
पारोळा १३
धरणगाव ९
जामनेर ३
एरंडोल ३
मोठ्या धरणातील पाणीसाठा असा...
धरण पाणीसाठा (टक्के)
हतनूर ३७.२५
गिरणा ३४.१३
वाघूर ५७.०८
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.