Water Storage : उपयुक्त पाणीसाठा २८ टक्क्यांवर

Water Crisis : मराठवाड्यातील सर्व ८७७ प्रकल्पांमधील उपयुक्त पाणीसाठा २८ टक्क्यांवर आला आहे. शिवाय पावसाचे आगमनही लांबल्याने मराठवाड्यावर चिंतेचे ढग जमा झाले आहेत.
Dam Water Storage
Dam Water StorageAgrowon
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar News : मराठवाड्यातील सर्व ८७७ प्रकल्पांमधील उपयुक्त पाणीसाठा २८ टक्क्यांवर आला आहे. शिवाय पावसाचे आगमनही लांबल्याने मराठवाड्यावर चिंतेचे ढग जमा झाले आहेत.

मराठवाड्यात सर्वाधिक संख्येने असलेल्या लघू प्रकल्पांतील पाणीसाठ्याची अवस्था अत्यंत दयनीय आहे. सर्व ७४९ लघू प्रकल्पांत सरासरी केवळ १० टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.

मध्यम प्रकल्पांची अवस्थाही समाधानकारक नसून ७५ मध्यम प्रकल्पांत केवळ २० टक्के उपयुक्त पाणी उरले आहे. मोठ्या ११ प्रकल्पांत ३६ टक्के, गोदावरी नदीवरील १५ बंधाऱ्यांमध्ये ३४ टक्के तर तेरणा, मांजरा, रेना नदीवरील २७ बंधाऱ्यांमध्ये केवळ २६ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक असल्याची माहिती जलसंपदा विभागाच्या वतीने देण्यात आली.

Dam Water Storage
Water Shortage : भूगर्भातील पाणी पातळी खालावली

सिद्धेश्वर प्रकल्पात उरले नाही उपयुक्त पाणी

मराठवाड्यातील ११ मोठ्या प्रकल्पांपैकी हिंगोली जिल्ह्यातील सिद्धेश्वर प्रकल्पात उपयुक्त पाण्याचा थेंबही शिल्लक नाही. दुसरीकडे माजलगाव व मांजरा प्रकल्पात प्रत्येकी २२ टक्के, निम्न तेरणा व निम्न मणार प्रकल्पात प्रत्येकी ३४ टक्के, निम्न दुधना २८ टक्के, विष्णुपरी ४७ टक्के, जायकवाडी ३१ टक्के, येलदरी ५७ टक्के, उर्ध्व पेनगंगा ४६ टक्के तर सीनाकोळेगाव प्रकल्पात केवळ चार टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.

धाराशिवमधील मध्यम प्रकल्पांत सर्वांत कमी उपयुक्त पाणी

मराठवाड्यातील ७५ माध्यम प्रकल्पांत केवळ २० टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामध्ये सर्वांत कमी १७ टक्के उपयुक्त पाणीसाठा धाराशिवमधील १७ मध्यम प्रकल्पांत शिल्लक आहे. त्यापाठोपाठ बीड व नांदेडमधील मध्यम प्रकल्पांत २२ टक्के, परभणीमधील प्रकल्पांत २३ टक्के, लातूरमधील प्रकल्पांत १९ टक्के, जालन्यामधील प्रकल्पांत २५ टक्के तर छत्रपती संभाजीनगरमधील मध्यम प्रकल्पांत २१ टक्के उपयुक्त पाणी शिल्लक आहे.

Dam Water Storage
Water Shortage : पुणेकरांनो पाणी जपून वापरा, १८ धरणांनी गाठला तळ

हिंगोलीतील २७ लघू प्रकल्पांत केवळ तीन टक्के साठा

मराठवाड्यातील ७४९ लघू प्रकल्पांपैकी हिंगोलीतील २७ लघू प्रकल्पांत केवळ तीन टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. त्यापाठोपाठ छत्रपती संभाजीनगर, लातूर, धाराशिव, परभणी जिल्ह्यातील लघू प्रकल्पांत ९ टक्के, जालनामधील लघू प्रकल्पांत ८ टक्के, नांदेडमधील लघू प्रकल्पांत १९ टक्के तर बीडमधील लघू प्रकल्पांत ११ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.

४७ लघू प्रकल्प पडले कोरडे

मराठवाड्यातील ७४९ लघू प्रकल्पांपैकी ४७ लघू प्रकल्प कोरडे पडले आहेत. त्यामध्ये छत्रपती संभाजीनगरमधील पाच, बीड व धाराशिवमधील प्रत्येकी २१ लघू प्रकल्पांचा समावेश आहे. दुसरीकडे ३३५ लघू व १४ मध्यम प्रकल्पांतील पाणीसाठा जोत्याखाली गेला आहे.

पाणीसाठा चौथ्याखाली गेलेल्या मध्यम प्रकल्पांमध्ये बीडमधील ५, छत्रपती संभाजीनगरमधील चार, धाराशिवमधील तीन व जालना, नांदेडमधील प्रत्येकी एका प्रकल्पाचा समावेश आहे.

पाणीसाठा जोत्याखाली गेलेल्या ३३५ लघू प्रकल्पांमध्ये छत्रपती संभाजीनगरमधील ४९, जालनामधील ३७, बीडमधील ५३, लातूरमधील ४६, धाराशिवमधील ८४, नांदेडमधील ३६, परभणीतील १४ व हिंगोलीतील १६ लघू प्रकल्पांचा समावेश आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com