
जालना : शेतकऱ्यांनी पेरणी (Sowing) करताना देशी बियाण्यांना (Indigenous Seed) प्राधान्य देण्याची गरज असल्याचे मत जिल्हाअधीक्षक कृषी अधिकारी तथा कृषी विकास अधिकारी भीमराव रणदिवे यांनी व्यक्त केले. श्री. रणदिवे म्हणाले, की आधुनिक शेती पद्धतीत कृषी पर्यावरणीय दृष्टिकोनातून शुद्ध व देशी बियाणांचा वापर करणे आवश्यक आहे.
देशी बियाण्याचा वापर आणि क्षेत्र वाढवण्यासाठी शेतकऱ्यांनी उत्पादित केलेली बियाणे म्हणून दगडी ज्वारी, अल्प प्रमाणात पेशी गहू, खपली गहू , खड्का तूर, इत्यादी बियाणे काही शेतकऱ्यांकडे उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी म्हणून तालुका स्तरावर तालुका कृषी अधिकारी,पंचायत समितीचे कृषी अधिकारी, किंवा आत्माचे तालुका तंत्र व्यवस्थापक व सहायक तंत्र व्यवस्थापक यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहनही जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री रणदिवे यांनी केले आहे.
देशी बियाणांची वैशिष्ट्ये
देशी बियाणांत उच्च दर्जाची पोषणमूल्ये असतात. खाण्यास चवदार.
हवामान बदलात तग धरण्याची क्षमता.
बदलत्या हवामानाच्या काळात वैशिष्ट्यपूर्ण पीक जातींच्या स्थानिक ज्ञानाचे संकलन, तसेच शुद्ध बियाणांची निर्मिती"
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.