Tomato Bhav: मागील एक महिन्यापासून टोमॅटोचे भावही कमी होण्याचे नाव घेत नाहीत. देशभरात टोमॅटोचे भाव १०० रुपये किलोवर पोहोचले आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात काॅंग्रेसचे खासदार कार्तिकेय शर्मा यांनी राज्यसभेत प्रश्न विचारला होता. त्याला केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण राज्यमंत्री अश्विनीकुमार चौबे यांनी उत्तर दिले.
राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे म्हणाले की, टोमॅटोच्या किमतीत सध्याची वाढ रोखण्यासाठी आणि ते ग्राहकांना परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने बाजार हस्तक्षेप योजना (MIS) लागू करून टोमॅटोची खरेदी सुरू केली आहे. तसेच ग्राहकांना अत्यंत सवलतीच्या दरात उपलब्ध करून दिले आहे.
चौबे यांनी सांगितले की, टोमॅटो पिकाचा हंगामात कर्नाटकसह दक्षिण भारतात पांढऱ्या माशीच्या किडीचा प्रादुर्भाव आणि उत्तर भारतात झालेल्या अतिवृष्टीचा उत्पादनावर परिणाम झाला आहे. त्यामुळे देशभरात टोमॅटोचा पुरवठा विस्कळीत झाला. त्यामुळे देशातील अनेक शहरात १०० रुपयांपेक्षा जास्त दरात टोमॅटो विकला जात आहे.
यासाठी शासनाने बाजार हस्तक्षेप योजना (MIS) लागू करून राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ (NCCF) आणि राष्ट्रीय कृषी सहकारी पणन महासंघ (NAFED) च्या माध्यमातून आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्रातील मंडईंमधून टोमॅटो खरेदी सुरू आहेत. त्याची दिल्ली-एनसीआर, बिहार, राजस्थानमधील ग्राहकांना परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध करून देत आहोत.
महाराष्ट्रातील नाशिक, नारायणगाव व औरंगाबाद पट्ट्यातून तसेच मध्य प्रदेशातून नवीन पिकाची आवक वाढल्याने टोमॅटोचे दर खाली येण्याची अपेक्षा आहे. टोमॅटोच्या किमतीत सध्याच्या वाढीमुळे शेतकऱ्यांना टोमॅटोचे अधिक पीक घेण्यास प्रोत्साहन मिळू शकते, ज्यामुळे येत्या काही महिन्यांत भाव स्थिर राहण्याची अपेक्षा मंत्री चौबे यांनी व्यक्त केली
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.