
Vardha News : पावसाने खंड दिल्याने हवालदील झालेल्या शेतकऱ्यांसमोर आता गुलाबी बोंड अळीचे संकट उभे ठाकले आहे. वर्धा, देवळी, हिंगणघाट या तालुक्ंयात प्रादुर्भाव दिसून आल्याने पीक हातचे गमावण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये आहे. दुसरीकडे कृषी विज्ञान केंद्राच्या तज्ज्ञांनी मात्र प्रादुर्भाव नियंत्रणात राहण्याची शक्यता वर्तवीत शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
कपाशी उत्पादक म्हणून वर्धा जिल्ह्याची ओळख आहे. हिंगणघाट तालुक्यात कापसावर आधारीत प्रक्रिया उद्योग, जीनिंग व्यवसाय देखील यामुळेच वाढीस लागले आहेत. यंदा सुमारे २ लाख १९ हजार ३२ हेक्टरवर कपाशीची लागवड करण्यात आली आहे.
गेल्या दोन वर्षांपूर्वी बोंड अळीच्या परिणामी शेतकऱ्यांवर हे पीक गमावण्याची वेळ आली होती. यंदा पुन्हा गुलाबी बोंड अळीने डोके वर काढल्याने शेतकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वर्धा, हिंगणघाट, देवळी या तालुक्यात काही गावांमध्ये हा प्रादुर्भाव असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्या पार्श्वभूमीवर केव्हीके सेलसुरा तज्ज्ञांनी केळापूर, पवनार या भागांत पीक पाहणी केली.
यावेळी धुऱ्यापासून काही अंतरावरील झाडांवर प्रादुर्भाव आढळून आला. विशेष म्हणजे या पाहणीत ३५ टक्के बोंडीवर प्रादुर्भाव आढळून आला आहे. या पार्श्वभूमीवर एकरी दोन किंवा त्यापेक्षा अधिक कामगंध सापळे लावण्याचे आवाहन केव्हीके प्रमुख डॉ. जीवन कतोरे यांनी केले. यामध्ये नर पतंग किती आढळतात यावरून प्रादुर्भावाची स्थिती लक्षात येते. तसेच अळीला पोषक वातावरण राहिल्याचे ते म्हणाले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.