
Chhatrapati Sambhaji Nagar News : कांद्यावर ४० टक्के निर्यात शुल्क आकारण्याचा केंद्र सरकारचा निर्णय हा कांदा उत्पादकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान करून जाणार आहे. गेल्या वर्षभरात कांद्याला मातीमोल दर मिळाला, तेव्हा सरकारने डोळेझाक केली. मात्र आता कांद्याच्या दरात काहीशी वाढ होत असल्याचे जाणवताच केंद्राने हा निर्णय शेतकऱ्यांच्या माथी लादला आहे. या निर्णयाच्या निषेधार्थ पैठण येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे जिल्हा युवा अध्यक्ष माउली मुळे यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी (ता. २३) निदर्शने करण्यात आली.
या वेळी माजी आमदार संजय वाघचौरे यांनी निदर्शने आंदोलनात सहभागी होवुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला. केंद्र सरकारच्या धरसोड धोरणांमुळे गेल्या काही वर्षांत उत्पादक शेतकऱ्यांना सातत्याने फटका बसतो आहे.
कांद्याला चांगला दर मिळण्याची स्थिती निर्माण झाली, की कधी निर्यातबंदी तर कधी निर्यात शुल्कात भरमसाट वाढ करून शेतकऱ्यांच्या ताटात माती कालवायचे हे धोरण केंद्र सरकार सातत्याने राबवीत आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत असल्याचा आरोप आंदोलक शेतकरी यांनी केला.
या वेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा युवा अध्यक्ष माउली मुळे, पवन शिसोदे, सुभाष नवथर, शिवाजी साबळे, बद्री बोंबले, विजय कुलकर्णी, श्री. उगले शिंदे, किशोर सांगळे, सचीन बोडखे, सोनू औटे, प्रकाश पवार, विनोद औटे, अमोल औटे, संभाजी काटे, रवींद्र आंबले, डॉ. गुलदाद पठाण, अमोल कर्डिले, मनोज दौंड, उद्धव मापारी, शेलुकर, अंकुश काळे, दिलीप बनकर, शिशुपाल औटे आदी उपस्थित होते.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.