
Buldana News : दोन एकरात लागवड केलेल्या टोमॅटो पिकापासून अतोनात नुकसान झाल्याने शासनाने मदत द्यावी, अशी मागणी देऊळगाव मही येथील शेतकऱ्याने केली. याबाबत तहसीलदार, तालुका कृषी अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. शेताचा पंचनामा करण्याबाबतही त्यांनी विनंती केली आहे.
शेतकरी मधुकर उत्तमराव शिंगणे यांनी दिलेल्या निवेदनानुसार, त्यांनी दोन एकरात टोमॅटोची लागवड केली होती. बाजारात टोमॅटोला मागणी नसल्याने अतोनात नुकसान झाले आहे. पिकासाठी आतापर्यंत साधारणपणे दोन लाख रुपयांचा खर्च झाला आहे.
मागील महिन्यात कोबीचे दोन एकरात लागवड केलेले पीकही दर न मिळाल्याने हातातून गेले. तेव्हा या पिकात शेळ्या सोडल्या. तेव्हा कोबी पिकासाठी एक लाख ९० हजारांचा खर्च झाला होता. आधी कोबी व नंतर आता टोमॅटो पिकामुळे अतोनात नुकसान झाले आहे.
सध्या शेतात टोमॅटोचे पीक उभे असून झाडांवर मोठ्या प्रमाणात फळे लागलेली आहेत. बाजारात भाव नसल्याने टोमॅटो तोडणीचाही खर्च निघत नाही. त्यामुळे काढणीअभावी सर्व फळे झाडावर पिकली आहेत.
अधिकाऱ्यांनी नुकसानीचा पंचनामा करावा, अशी मागणी शिंगणे यांनी केली. या संदर्भात सिंदखेडराजा मतदार संघाच्या आजी, माजी आमदारांना माहिती दिली आहे. पिकांचे किती नुकसान झाले, याचा पंचनामा करून घेण्यास त्यांनी संबंधितांना सांगितले आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.