
Sindhudurg News : बदलत्या वातावरणामुळे अडचणीत आलेल्या कोकणातील पीककर्ज घेतलेल्या आंबा, काजू आणि इतर फळपीक बागायतदारांची माहिती देण्यास बँकांकडून कुचराई केली जात आहे. आठ दिवस उलटून गेले तरी एकाही बँकेने अद्याप सहकार निबंधक कार्यालयाकडे बागायतदारांची यादी दिलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.
बदलत्या वातावरणाचा मोठा फटका गेल्या दहा वर्षांपासून कोकणातील फळबागायतदारांना बसत आहे. गेल्या तीन-चार वर्षांत अवकाळी पाऊस, गारपीट, ढगाळ वातावरण आणि विविध वादळे यामुळे बागायतदारांचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे हजारो बागायतदार आर्थिक संकटात सापडले आहेत.
या बागायतदारांना शासनाने दिलासा द्यावा, अशी मागणी वेळोवेळी विविध शेतकरी संघटना, बागायतदार संघटनेच्या माध्यमातून सरकारकडे करण्यात आली. अनेक आंदोलने, मोर्चे काढण्यात आले, परंतु कोणताही निर्णय शासनाने घेतला नव्हता.
मात्र आता शासनाने आंबा, काजूसह विविध फळपीक बागायतदारांनी २०१४ ते २०२३ कालावधीतील घेतलेल्या पीक कर्जाची माहिती मागविली आहे. सहकार निबधंकांकडून आठ दिवसांपूर्वीच पीककर्ज घेतलेल्या बागायतदारांची यादी देण्यासाठी बँका, सहकारी संस्थांना पत्र पाठविली आहेत. मात्र अद्याप एकाही बँकेने यादी दिेलेली नाही. बँकांकडून यादी देण्यास विलंब झाल्यामुळे शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.