Rain Update : अकोला जिल्ह्यात २० मंडलांत पावसाचा खंड

Akola Rain News : प्रामुख्याने कोरडवाहू व हलक्या जमिनीतील पिकांचे उत्पादन ५० टक्क्यांपेक्षा जास्त, तर उर्वरित क्षेत्रालाही उत्पादकतेत फटका बसण्याची शक्यता वाढली आहे.
Kharif crop
Kharif cropAgrowon
Published on
Updated on

Akola News : दिवसेंदिवस पाऊस लांबत चालल्याने जिल्ह्यात पिकांची अवस्था बिकट झाली आहे. प्रामुख्याने कोरडवाहू व हलक्या जमिनीतील पिकांचे उत्पादन ५० टक्क्यांपेक्षा जास्त, तर उर्वरित क्षेत्रालाही उत्पादकतेत फटका बसण्याची शक्यता वाढली आहे. जिल्ह्यात तब्बल २० मंडले सध्या दुष्काळी परिस्थितीतून जात आहेत.

पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत या खरीप हंगामात ज्या महसूल मंडलात कमी पावसामुळे ५० टक्के उत्पादन घटीची शक्यता निर्माण झाली आहे, अशा मंडलातील शेतकऱ्यांना २५ टक्के मर्यादेत आगाऊ रक्कम देण्याची तरतूद आहे. या अनुषंगाने जिल्ह्यातील २० महसूल मंडले निश्‍चित करण्यात आली आहेत.

Kharif crop
Solapur Rain Update : सोलापूर जिल्ह्यातील ७१ मंडलांत अत्यंत कमी पाऊस

या मंडलांमध्ये पावसाचा मोठा खंड निर्माण झाला. पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत प्रतिकूल परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षित उत्पादनात मागील सात वर्षांच्या सरासरी उत्पादनाच्या ५० टक्क्यांपेक्षा जास्त घट अपेक्षित असल्याचे प्रथम दर्शनी दिसत आहे.

परिणामी जिल्हाधिकारी या मंडलांमध्ये नुकसान भरपाईच्या दृष्टीने अहवाल मागविणार आहेत. अहवाल आल्यानंतर पीकविमा कंपनीला २५ टक्के अग्रिम देण्याबाबत कार्यवाही होऊ शकते. या मंडलांमध्ये लवकरच सर्वेक्षणाचे काम सुरू होण्याची शक्यता आहे.

Kharif crop
Rain Update : पावसाचा २१ दिवसांपेक्षा अधिक खंड

जिल्ह्यात अकोट तालुक्यात उमरा, तेल्हारामध्ये माळेगाव, पाथर्डी, बाळापूर तालुक्यात बाळापूर, उरळ, निंबा, हातरुण, पातूर, अकोला तालुक्यात घुसर, बोरगाव, पळसो बढे, सांगळूद, कुरणखेड, बार्शीटाकळी तालुक्यात धाबा, मूर्तिजापूर तालुक्यात मूर्तिजापूर, हदगाव, निंबा, माना, शेलू आणि जामठी अशा मंडलांचा समावेश आहे.

या मंडलांमध्ये २४ जुलैपासून पावसाने खंड दिलेला आहे. काही मंडलांत २१ ते २७ दिवसांपर्यंत खंडाचा कालावधी झालेला आहे. अद्यापही पाऊस येण्याची चिन्हे दिसत नसल्याने तब्बल एक महिना पावसात खंड निर्माण होऊ शकतो. त्यामुळे येत्या काही दिवसांत इतर मंडलांचाही समावेश या यादीत वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

कमी पावसामुळे मूर्तिजापूर तालुक्यात सर्वत्रच खरीप धोक्यात आला आहे. कोरडवाहू पिकांचे उत्पादन पावसाअभावी ५० टक्क्यांपेक्षा जास्त घटण्याची चिन्हे आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी अध्यादेश काढून विमा कंपनीला नुकसान भरपाईचा अध्यादेश काढावा
- राजू वानखडे, शेतकरी, मूर्तिजापूर, जि. अकोला

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com