
Sangli News : जिल्ह्यात जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत पाऊस झाला. परंतु त्यानंतर पावसाने उघडी दिली आहे. जिल्ह्यात ६८ महसूल मंडल आहेत, त्यापैकी ३६ मंडलांत २१ आणि २१ दिवसांपेक्षा अधिक पावसाचा खंड पडल आहे. त्यामुळे पावसाच्या खंडामुळे नुकसान झालेल्या पिकांचे सर्वेक्षण कधी होणार, असा प्रश्न शेतकरी उपस्थित करू लागले आहेत.
जिल्ह्यात यंदा पावसाने दडी मारली होती. परंतु जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. जुलै महिन्यातही अनेक भागांत हलका आणि मध्यम पाऊस झाला. या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून पावसाने उघडिप दिली.
कधी ढगाळ वातावरण तर कधी उन्ह यामुळे पिके वाळू लागली आहेत. ऑगस्ट महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात जिल्ह्यात २४.९ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. वास्तविक पाहता ज्या दिवशी अडीच मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला, तर त्याला प्रजन्य दिन संबोधतात. परंतु २८ जुलै ते ऑगस्ट महिना संपत आलां तरी पावसाने पूर्णतः उघडिप दिली आहे.
जिल्ह्यात ६८ महसूल मंडले आहेत. त्यापैकी ३६ मंडलांत २१ व २१ दिवसांपेक्षा अधिक पावसाचा खंड पडला आहे. आटपाडी तालुक्यातील खरसुंडी, कडेगाव तालुक्यांतील नेवरी, मिरज तालुक्यांतील मिरज, जत तालुक्यांतील जत, कुंभारी या पाच मंडलांत ३१ दिवस तर खानापूर तालुक्यातील खानापूर मंडलात ३२ दिवस पावसाने दडी मारली आहे. त्यातच अजून १० मंडलांत १९ दिवस पावसाचा खंड पडला आहे. आता ही मंडले त्यामध्ये वाढणार आहेत.
तालुकानिहाय पावसाचा
खंड असलेली मंडले
तालुका मंडल संख्या
मिरज ४
जत ६
खानापूर २
वाळवा ८
तासगाव ४
आटपाडी २
कवठेमहांकाळ ४
पलूस २
कडेगाव ४
एकूण ३६
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.