सिंधुदुर्गनगरी ः जिल्ह्यात परतीच्या पावसाची रिपरिप (Rainfall) मंगळवारीही (ता. ११) सुरू आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील भातपीक कापणी (Paddy harvesting) रखडली आहे. परतीच्या पावसामुळे भातपीक (Paddy Crop) संकटात सापडले असून शेतकऱ्यांची अस्वस्थता वाढली आहे.
जिल्ह्यात रविवारी (ता. ९) पहाटेपासून पुन्हा परतीच्या पावसाला सुरुवात झाली. सोमवारी दिवसभर पावसाच्या सरी जिल्ह्यात सर्वत्र कोसळत होत्या. त्यामुळे भातपीक कापणीच्या तयारीत असलेल्या शेतकऱ्यांचा हिरमोड झाला.
दरम्यान मंगळवारी पहाटेपासूनच पावसाच्या सरी जिल्ह्यात कोसळत आहेत. पावसाची रिपरिप कायम असून अधूनमधून पावसाच्या जोरदार सरीदेखील पडत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे परिपक्व झालेल्या भातावरील संकट अधिक गडद होऊ लागले आहे. परतीच्या पावसामुळे भातकापणी रखडली आहे.
विजयादशमीनंतर भातकापणी करण्याच्या तयारीत अनेक शेतकरी होते. परंतु, परतीच्या पावसामुळे कापणी करता येत नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता वाढताना दिसून येत आहे. जिल्ह्यात ६० ते ६५ टक्के भातपीक परिपक्व झाले आहे. परतीच्या पावसाचा जोर आणखी तीन-चार दिवस राहिल्यास या पिकांचे मोठे नुकसान होणार असल्यामुळे भात उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.