Rahul Gandhi : राहुल गांधी यांची ‘भारत जोडो’ यात्रा सुरू

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला बुधवारपासून (ता. ७) प्रारंभ झाला. यात्रेला सुरुवात करण्यापूर्वी त्यांनी तमिळनाडूतील श्रीपेरुंबदूर येथे वडील आणि माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या स्मारकाला भेट दिली.
Rahul Gandi
Rahul GandiAgrowon

कन्याकुमारी (वृत्तसंस्था) ः काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandi) यांच्या भारत जोडो यात्रेला (Bharat Jodo Yatra) बुधवारपासून (ता. ७) प्रारंभ झाला. यात्रेला सुरुवात करण्यापूर्वी त्यांनी तमिळनाडूतील श्रीपेरुंबदूर येथे वडील आणि माजी पंतप्रधान राजीव गांधी (Rajiv Gandhi) यांच्या स्मारकाला भेट दिली.

Rahul Gandi
Soybean Rate : दर पाडण्यासाठीच वायदे बंदीला ‘सोपा’चे समर्थन

राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला कन्याकुमारीपासून प्रारंभ झाला. ते रोज किमान २० किलोमीटर अंतर पायी जातील. या पाच महिन्यांत १२ राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांचा समावेश असणार आहे. या यात्रेचे एकूण अंतर सुमारे ३५०० किलोमीटर असेल. ही यात्रा कन्याकुमारीपासून सुरू होऊन काश्मीरमध्ये संपेल.

कन्याकुमारी, तिरुवनंतपुरम, कोची, निलांबूर, म्हैसूर, बेल्लारी, रायचूर, विकाराबाद, अकोला, नांदेड, जळगाव जामोद, इंदूर, कोटा, दौसा, अलवर, बुलंदशहर, दिल्ली, अंबाला, पठाणकोटमार्गे जम्मू आणि श्रीनगरमध्ये यात्रेची सांगता होणार आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com