
Narendra Modi : सरकार कृषी क्षेत्र आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी दरवर्षी ६.५ लाख कोटी रुपये खर्च करत आहे. तसेच देशाला स्वयंपाकाच्या तेलात स्वावलंबी बनवण्यासाठी सहकारी संस्थांना मदत करण्यात येणार असल्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय सहकार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना माहिती दिली.
पंतप्रधानांनी २०१४ मध्ये सत्तेत आल्यापासून पंतप्रधान किसान योजना, एमएसपी ऑपरेशन्स आणि खत अनुदानासारख्या केलेल्या कामांचा लेखाजोखा मांडला.
PM मोदी म्हणाले की, मागच्या नऊ वर्षांत MSP वर शेतमाल खरेदी करून १५ लाख कोटींहून अधिक रक्कम शेतकऱ्यांना देण्यात आली आहे. गेल्या वर्षी खत अनुदानासाठी सरकारने १० लाख कोटी रुपये खर्च केल्याचीही माहिती त्यांनी दिली.
सरकार शेती आणि शेतकऱ्यांवर दरवर्षी सुमारे ६.५ लाख कोटी खर्च करत असल्याचीही माहिती सांगण्यात आली. पीएम मोदी पुढे म्हणाले की, सरकार दर वर्षी प्रत्येक शेतकऱ्याला कोणत्या ना कोणत्या स्वरूपात सरासरी ५० हजार रुपये देत असल्याचे त्यांनी सांगितलं.
किसान समृद्धी केंद्रांमुळे शेतीच्या आधुनिकीकरणाला चालना देण्यासाठी गेल्या चार वर्षांत पंतप्रधान किसान योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात २.५ लाख कोटी थेट पाठवण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
२०१४ पूर्वीच्या पाच वर्षांसाठी एकूण कृषी अर्थसंकल्प ९० हजार कोटी रुपयांपेक्षा कमी होता यावरून ही रक्कम किती मोठी आहे याचा अंदाज तुम्ही लावू शकता, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
जागतीक सहकार दिनानिमीत्त दोन दिवसीय कार्यक्रम असणार आहेत. यामध्ये शेतीविषयक विविध विषयांवर चर्चा होणार असल्याची माहिती देण्यात आली.
या कार्यक्रमात प्रदर्शनही असणार आहे. याचबरोबर सहकार वाढीसाठी लागणाऱ्या भविष्यातील धोरणांवर चर्चा होणार आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.