Paddy Plantation : आंबेगाव तालुक्यात पावसाअभावी भात लागवड खोळंबली

Kharif Paddy : गेल्या आठवड्यात पाऊस न झाल्याने शेतकरी काळजीत होते, पण शुक्रवारपासून (ता. १४) तुरळक पाऊस सुरू झाला आहे.
Paddy Plantation
Paddy Plantation Agrowon
Published on
Updated on

Kharip Paddy Plantation : तालुक्यातील १४३ महसुली गावांत पुरेशा प्रमाणात पाऊस पडलेला नसल्यामुळे अद्याप ४५ टक्के पेरण्‍या खोळंबल्या आहेत. २० हजार ३४४ हेक्टर क्षेत्रांतील (५५ टक्के) पेरण्या झालेल्या आहेत.

पूर्व भागातील बाजरीच्या पेरण्या अद्याप झालेल्या नाहीत. सोयाबीन, बटाटा आदी पिके पावसाअभावी धोक्यात आल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. तसेच भाताची रोपे तयार झाली आहेत, पण लागवड थांबली आहे.

‘‘१५ दिवसांपूर्वी भाताची पेरणी झाली असून, रोपांची वाढ सुरू आहे. गेल्या आठवड्यात पाऊस न झाल्याने शेतकरी काळजीत होते, पण शुक्रवारपासून (ता. १४) तुरळक पाऊस सुरू झाला आहे. तयार झालेल्या रोपांची लागवड करण्यासाठी जोरदार पावसाची गरज असून खाचरे पाण्याने भरणे आवश्यक आहे,’’ असे असाणे येथील शेतकरी धोंडू सखाराम गभाले यांनी सांगितले.

Paddy Plantation
Paddy Crop Damage : कांदाटी खोऱ्यात भातपीक गवारेड्यांकडून उद्ध्वस्त

‘‘सातगाव पठार भागात तीन हजार ८०० हेक्टर क्षेत्रांत बटाटा लागवड झाली आहे. अजून ५०० हेक्टर क्षेत्रात बटाटा लागवड होणार असून, त्यासाठी पावसाची गरज आहे. वेळेत पाऊस न झाल्यास लागवड केलेले बटाटा पीक अडचणीत येऊ शकते,’’ अशी भीती पारगाव तर्फे खेड येथील शेतकरी भाऊसाहेब सावंत पाटील यांनी व्यक्त केली.

Paddy Plantation
Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १०,२१५ हेक्टरवर भात लावण्या

‘‘खरीप हंगामात सातगाव पठार भागातील पारगाव तर्फे खेड, पेठ, भावडी, कुरवंडी, कोल्हारवाडी, कारेगाव, थुगाव आदी गावांत मुख्य पीक म्हणून बटाटा पीक घेतले जाते. गेल्या वर्षीच्या तुलनेत पाऊस अल्प झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत,’’ असे अशोक रामदास बाजारे यांनी सांगितले.

आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात लोणी, धामणी, पहाडदरा, वडगावपीर आदी आठ गावांत पाऊस नसल्याने एक हजार हेक्टर क्षेत्रातील बाजरीच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. ‘‘घोड व मीना नदी काठावरील तसेच उजव्या व डाव्या कालव्याचे पाणी उपलब्ध झालेल्या ३५ ते ४० महसुली गावात शेतकऱ्यांनी प्रामुख्याने गुरांसाठी चारा पिके, भाजीपाला व तरकारी आदी पिके घेतली आहे.

शाश्‍वत पाणी उपलब्ध झाल्याने सध्या ही पिके सुस्थितीत असली तरी दीर्घ काळासाठी ओढ्या-नाल्यांना पूर येण्यासाठी पावसाची गरज आहे,’’ असे आदर्शगाव गावडेवाडी येथील शेतकरी मच्छिंद गावडे यांनी सांगितले.

आंबेगाव तालुक्यात खरीप हंगामाचे सरासरी ३६ हजार ८०० हेक्टर क्षेत्र आहे. ७० आदिवासी महसुली गावे आहेत. पाच हजार १५० हेक्टरवर भातशेती केली जाते. ही शेती मॉन्सूनवर अवलंबून आहे. पूर्व भागात बाजरीच्या पेरण्या व सातगाव पठार भागात काही प्रमाणात बटाटा लागवड क्षेत्र खोळंबले आहे. पावसाच्या सरसरीत लक्षणीय घट झाली आहे.
- एन. डी. वेताळ, प्रभारी कृषी अधिकारी, आंबेगाव महसूल मंडळ… पावसाची टक्केवारी (१ जुलै ते १४ जुलै २०२३) पावसाची टक्केवारी (जुलै २०२२) घोडेगाव... २१.१ टक्के... १६६.४ टक्के आंबेगाव... ८४.३१ टक्के... ३११.४ टक्के कळंब... ७.६ टक्के... १०५.७ टक्के पारगाव... २.८ टक्के... १२३ टक्के मंचर... ७.३ टक्के... ११८.९ टक्के सरासरी... २४.६ टक्के... १६५.२ टक्के

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com