
Paddy Crop : गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने रसायनी परिसरास शनिवारी पहाटे विजेच्या कडकडाटासह हजेरी लावली. त्यामुळे बळिराजाला दिलासा मिळाला असून भातशेती बहरली आहे. याशिवाय भाजीपाला लागवडीलाही वेग आला आहे. वासांबे मोहोपाडा परिसरात काही वेळ वीजपुरवठा खंडित झाला होता.
वडगाव, आपटे, चावणे, गुळसुंदे, वासांबे-मोहोपाडा पंचक्रोशीतील शेतकरी खरिपाच्या हंगामात मोठ्या प्रमाणात भाताचे पीक घेतात. या वर्षी पाऊस उशिराने दाखल झाल्याने बियाण्यांची पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना फटका बसला.
तर पेरणी केल्यावर लावणीसाठी तयार केलेल्या रोपांना तसेच लावणी झालेल्या पिकाला जुलैमधील अतिवृष्टीचा फटका बसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी आधीच हवालदिल झाले आहेत.
महिन्याभरापासून वातावरणातील बदलामुळे शेतकरी चिंतेत आहेत. पावसाचा जोर कमी झाल्याने खत फवारणीत अडचणी येत होत्या. तसेच कीड-रोगाचा प्रादूर्भाव वाढण्याची शक्यता वाढली होती.
दरम्यान पहाटे झालेल्या जोरदार पावसामुळे पिकाला दिलासा मिळाला आहे. रीस परिसरात एक तास तर मोहोपाडा परिसरात एक तासाहून अधिक वेळ वीज पुरवठा खंडित झाला होता.
निसर्गाच्या लहरीपणाचा आतापर्यंत खरिपाच्या भातशेतीला सर्वाधिक फटका बसल्याचे तुराडे येथील भाऊ ठाकूर यांनी सांगितले तर खराब हवामानामुळे काही ठिकाणी पिकावर करपा रोग पडल्याचे असे सुदाम कडपे यांनी सांगितले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.