Marathwada Water Storage : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांची तहान कायम

Marathwada Water Crisis : ऑगस्ट महिना निम्मा संपत आला असताना मराठवाड्यातील पाणीसाठ्यांची तहान कायम आहे. पावसाच्या दांडीने ही परिस्थिती ओढावली आहे.
Water Storage
Water Storage Agrowon
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar News : ऑगस्ट महिना निम्मा संपत आला असताना मराठवाड्यातील पाणीसाठ्यांची तहान कायम आहे. पावसाच्या दांडीने ही परिस्थिती ओढावली आहे. मराठवाड्यातील ८७७ लघु, मध्यम, मोठ्या प्रकल्पांसह बंधाऱ्यांमध्ये केवळ ३५.६० टक्केच उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे, ही बाब चिंता वाढविणारी आहे.

यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीपासूनच पावसाचा लहरीपणा अनुभवायला येतो आहे. त्यामुळे पाणीसाठ्यांमध्ये अपेक्षित पाणी वाढ झाली. नाही अनेक पाणीसाठे अजूनही तळालाच असून काही तर कोरडे पडले आहेत. मराठवाड्यातील ११ मोठ्या प्रकल्पांमध्ये केवळ ४२.७३ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे.

सर्वांत मोठ्या जायकवाडी प्रकल्पात केवळ ३४ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक असून परभणीतील निम्न दुधना प्रकल्पात तसेच बीडमधील मांजरा प्रकल्पात २७ टक्के, येलदरी प्रकल्पात ६० टक्के, सिद्धेश्वर ४४, उर्ध्व पेनगंगा ६४, निम्न तेरणा २९, निम्न मनार ५१, विष्णुपुरी ८३ तर बीड जिल्ह्यातील माजलगाव प्रकल्पात सर्वांत कमी १५ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.

Water Storage
Water Crisis : भर पावसाळ्यात पाणी टंचाईचे संकट

७५ मध्यम प्रकल्पात केवळ २२.७० टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. छत्रपती संभाजीनगर व बीड मधील प्रत्येकी १६ मध्यम प्रकल्पांत सरासरी १८ टक्के उपयुक्त पाणी शिल्लक आहे. याशिवाय जालन्यातील ७ मध्यम प्रकल्पांत २४ टक्के, लातूरमधील ८ मध्यम प्रकल्पांत २२ टक्के, नांदेडमधील ९ मध्यम प्रकल्पांत ५० टक्के, परभणीतील २ मध्यम प्रकल्पांत २० टक्के, तर धाराशिवमधील १७ मध्यम प्रकल्पांत केवळ १४ टक्के उपयुक्त पाणी आहे.

Water Storage
Water Crisis : जिंतूर तालुक्यातील ३ लघु तलाव कोरडेच

७५ मध्ये प्रकल्पांपैकी २४ मध्यम प्रकल्पांत उपयुक्त पाण्याचा थेंब नाही. नांदेड व हिंगोली जिल्ह्यातील लघु प्रकल्प वगळता इतर जिल्ह्यांतील लघु प्रकल्पांची स्थिती दयनीय अशीच आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ९७ व बीडमधील १२६ लघु प्रकल्पात केवळ आठ टक्के उपयुक्त पाणी शिल्लक आहे.

याशिवाय परभणीतील २२ लघु प्रकल्पात दहा टक्के, धाराशिवमधील २०६ लोकप्रकल्पात ९ टक्के, लातूरमधील १३४ लघु प्रकल्पात २३ टक्के, हिंगोलीतील २७ लघु प्रकल्पात ७५ टक्के, नांदेडमधील ८० लघु प्रकल्पात ९१ टक्के तर जालन्यातील ५७ लघु प्रकल्पात सर्वांत कमी केवळ दोन टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.

२८७ लघु प्रकल्पांत नाही उपयुक्त पाण्याचा थेंब

मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांतील २८७ लघु प्रकल्पांत उपयुक्त पाण्याचा थेंब शिल्लक नाही. यामध्ये छत्रपती संभाजीनगरमधील ४३, जालन्यातील ४७, बीडमधील ८६, धाराशिवमधील १०९, नांदेडमधील दोन लघु प्रकल्पांचा समावेश आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com