
Gangapur Dam : आॅगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत माॅन्सूनच्या पावसाने ओढ दिल्याने खरीप हंगाम धोक्यात आला होता. दरम्यान, दोन दिवसांपासून राज्यभरात सर्वदूर वरुणराजाने कृपादृष्टी केली असून, शुक्रवारी (ता. ८) पहाटेपासून नाशिक जिल्ह्यात मुसळधार हजेरी लावली आहे. गंगापूर धरणाच्या पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात आवक झाल्याने धरणातून विसर्ग करण्यात आला. त्यामुळे नाशिकची गोदावरी नदी अनेक महिन्यानंतर पुन्हा खळखळू लागली.
अखेर अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर शुक्रवारी पहाटेपासून पावसाने नाशिकसह जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडला. जिल्ह्यात पडत असलेल्या सर्वदूर पावसाने गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली. त्यामुळे गंगापूर धरणातून 6282 क्यूसेक विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे गोदावरी नदी पुन्हा खळखळू लागली.
गोदावरीच्या पुराचे मापक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दुतोंड्या मारुतीला (Dutondya Maruti) यंदा पुराचे पाणीच लागलेले नव्हते. पण शुक्रवारी दुपारपासून नदीच्या पाणी पातळीत वाढ होऊ लागल्यानंतर दुतोंड्या मारुतीच्या बेंबीला पाणी लागल्याने नाशिककर सुखावले आहेत. दरम्यान, प्रशासनाच्यावतीने पावसाचा जोर कायम राहिल्यास विसर्ग (Water Discharged) वाढविण्यात येणार असल्याने नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.