
पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचा (मॉन्सून) परतीचा प्रवास (Monsoon Return Journey) आता अखेरच्या टप्प्यात आला आहे. गुरुवारी (ता. २०) ईशान्य आणि पूर्व भारतातील राज्यांसह देशाच्या बहुतांशी भागांतून मॉन्सून (Monsoon Update) परतला आहे. याशिवाय राज्यात विदर्भाच्या आणखी काही भागांतून मॉन्सून परतला आहे, असे हवामान विभागाने (Weather Department) जाहीर केले आहे.
मॉन्सूनने यंदा २० सप्टेंबर रोजी राजस्थान आणि कच्छच्या भागातून परतीचा प्रवास सुरू केला. परतीच्या प्रवासात मॉन्सूनची वाटचाल अडखळत सुरू आहे. शनिवारी (ता. १५) संपूर्ण बिहार, सिक्कीम, मेघालय, मध्य प्रदेशसह आसाम त्रिपुरा पश्चिम बंगालचा काही भाग, छत्तीसगड विदर्भासह महाराष्ट्राचा आणखी काही भागातून मॉन्सून परतला होता.
दरम्यान, गुरुवारी (ता. २०) मॉन्सूनने संपूर्ण झारखंड, पश्चिम बंगाल, ईशान्य भारतातील राज्य, ओडिशाच्या बहुतांशी भाग, विदर्भ, छत्तीसगडच्या आणखी काही भागातून माघार घेतली आहे. मॉन्सूनच्या परतीची सीमा पुरी, कंकेर, बुलडाणा ते डहाणूपर्यंत आहे.
परतीसाठी हवामान पोषक
पुढील दोन दिवसांत छत्तीसगड, ओडिशाचा उर्वरित भाग, महाराष्ट्राचा आणखी काही भाग, तेलंगणा, आंध्र प्रदेशच्या काही भागांतून मॉन्सून परतण्यास पोषक हवामान आहे.
पुणे ः नकाशातील निळी रेषा मॉन्सूनच्या परतीची सीमा दर्शवते (सौजन्य : हवामान विभाग).
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.