IMD Rainfall Alert : शेतकऱ्यांची चिंता पुन्हा वाढली. मागील तीन दिवस राज्याच्या बहुतांशी भागांमध्ये ढगाळ वातावरण होते. पण सर्वदूर पाऊस झाला नाही. तसेच पावसाचा जोरही कमी होता. त्यामुळं शेतकरी पावसाकडे डोळे लावून बसले आहेत. पण राज्यात पुढील पाच दिवस जोरदार पाऊस अंदाज नाही. हवामान विभागाने केवळ काही ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी पडतील, असा अंदाज दिला.
राज्यात पावसाने आज उघडीप दिली. काही ठिकाणी हलक्या सरी पडल्या. पण बहुतांशी भाग पावसासाठी तहानलेला आहे. हवामान विभागाच्या अंदाजाने शेतकऱ्यांची चिंता आणखी वाढवली. पुढील पाच दिवस राज्यात जोरदार पावसाचा अंदाज नाही. केवळ काही ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी पडू शकतात, असा अंदाज आहे.
राज्यात मागील दोन दिवस अनेक भागांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिला होता. पण कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही ठिकाणीच हलक्या सरी पडल्या. बहुतांशी भागात पाऊसच झाला नाही. आज तर उन्हाचा चटका चांगलाच वाढला होता. आज ढगाळ वातावरणही दिसले नाही. परिणामी पिकांची स्थिती नाजूक बनत आहे.
राज्यात पुढील पाच दिवस केवळ कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये हलक्या पावसाचा अंदाज आहे. इतर ठिकाणी पाऊस उघडीप देण्याची शक्यता आहे. पण स्थानिक वातारणामुळे अधून मधून सरी पडू शकतात. पण एकूणच राज्यभरातील शेतकऱ्यांची चिंता चांगलीच वाढणार आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.