
Manoj Jarange Hunger Strike : जालन्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे १७ दिवसांपासून उपोषण सुरू आहे. जरांगेच्या मागणीनुसार आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांसह आंतरवाली सराटीत दाखल झाले. मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेनंतर मनोज जरांगे यांनी उपोषण सोडले.
त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आंदोलकांशी संवाद साधत मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय आम्हीही मनोज सारखे स्वस्थ बसणार नाही, असं आश्वासन दिले.
मनोज जरांगेच्या आंदोलकावर पोलिसांनी लाठीचार्ज केला. त्यानंतर राज्यभरात मराठा समाज रस्त्यावर उतरला. अनेक ठिकाणी बंद, रास्तारोको आणि निदर्शने सुरू आहे. तसेच शरद पवार, उद्धव ठाकरे, अशोक चव्हाण, प्रकाश आंबेडकर यांच्यासह सर्वच पक्षांनी जरांगेच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. त्यामुळे मागील काही दिवसांपासून राज्याच राजकारण तापले होते. सरकारच्यावतीने दहा दिवसांपासून गिरीश बापट, संदीपान भुमरे, अर्जुन खोतकर यांच्याकडून शिष्टाईचे प्रयत्न सुरू होते. अखेर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जालन्यात जाऊन मनोज जरांगेंशी चर्चा केली. मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर जरांगेंनी उपोषण मागे घेतले.
उपोषणस्थळावरून आंदोलकांशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संवाद साधला. शिंदे म्हणाले, सरकारची भूमिका स्पष्ट आहे. यापूर्वीही सरकारने मराठा समाजाला 17 टक्के आरक्षण दिलं होतं. अध्यादेश काढला त्याला कोर्टाने स्थगित केला. त्यानंतर पुन्हा कायदा केला. पण दुर्देवाने सर्वोच्च न्यायालयाने ते आरक्षण रद्द केलं. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी हे सरकार कटिबद्ध आहे. मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय आम्हीही मनोज सारखे स्वस्थ बसणार नाही, असे आश्वासन शिंदे यांनी दिले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.