
Kolhapur News : मागच्या दोन महिन्यापासून कोल्हापूर जिल्ह्यात लम्पी संसर्गजन्य रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढला आहे. जिल्ह्यातील अनेक तालुक्यात याचा संसर्ग वाढल्याने जनावरांना वेळेत उपचार होत नसल्याने गायी आणि बैलांच्या मृत्यू संख्येत वाढ झाली आहे.
दरम्यान यावर आरोग्य प्रशासनाकडून काम अत्यंत संथ गतीने सुरू असल्याचे आरोप करण्यात आले होते. यावर कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांनी अचानक गावांना भेटी दिल्या. यावेळी आरोग्य कर्मचारी करत असलेल्या कामाचा त्यांनी आढावा घेतला.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांनी अचानक हातकणंगले तसेच शिरोळ तालुक्यातील नृसिंहवाडीसह अन्य गावांना भेटी दिल्या. या भेटीवेळी त्यांनी गावागावांत पसरत असलेल्या लम्पी आजाराची व सुरू असणाऱ्या लसीकरणाची माहिती घेतली. पाटील यांच्या अचानक झालेल्या गाव भेटीने पशुसंवर्धन विभाग व गट विकास अधिकारी कार्यालयाची चांगलीच धावपळ उडाली.
जिल्ह्यात सर्व जनावरांचे लसीकरण करण्यात येत आहे. जवळपास ९५ टक्के लसीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. या कामाची माहिती घेण्यासाठी पाटील यांनी रविवारी अचानक शिरोळ, हातकणंगले तालुक्यातील काही गावांना भेटी दिल्या.
७ हजार जनावरांना लम्पी आजार झाला होता, तो पूर्ण बरा झाला आहे. तर २२६३ जनावरांना सध्या या आजाराची लागण झाली असून त्यांच्यावर योग्य उपचार सुरू आहेत. आतापर्यंत लम्पी आजाराने ५८० जनावरांचा मृत्यू झाला आहे. लम्पी आजाराला रोखण्यासाठी पशुसंवर्धन विभागाकडून मोठ्या प्रमाणात लसीकरण सुरू आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.