
सोलापूर : काँग्रेस पक्षातील (Congress Party) लोकांनी कट कारस्थान करून त्या वेळी मला मुख्यमंत्रिपदावरून काढले आणि राज्यपाल म्हणून आंध्र प्रदेशला पाठविले, अशा शब्दांत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) यांनी आपल्याच स्वपक्षीय नेत्यांवर नाव न घेता थेट बाण रोखला.
महाराष्ट्र गुजराती समाज महामंडळातर्फे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना सोलापुरात रविवारी (ता. १९) भारत गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्या सत्काराला उत्तर देताना शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना झालेली निवडणूक आणि ती जिंकूनही पदावरून हटविल्याची खंत व्यक्त केली.
श्री. शिंदे म्हणाले, की मुख्यमंत्री असताना मी गुजराती समाजाला दोन टक्के आरक्षण दिले होते. तेवढे एक चांगले काम मी गुजराती समाजासाठी केले होते. लोक आता विसरून गेले की सुशीलकुमारांनी ते चांगले काम केले. त्यानंतर एका गुजराती साधूंनी मला बोलावून घेऊन आशीर्वाद दिला होता.
मुख्यमंत्री असताना मी हे सगळे केल्यामुळेच मी महाराष्ट्रात परत निवडणुका जिंकून आलो होतो. त्या वेळी निवडणुका जिंकणे साधी गोष्ट नव्हती; मात्र, (व्यासपीठाकडे बोट दाखवत) यांना माहिती आहे, आतले कारस्थान. कसे मला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदावरून काढले आणि राज्यपाल म्हणून आंध्र प्रदेशला पाठविले. पण ठीक आहे.
मी त्यानंतर दिल्लीच्या मंत्रिमंडळात गेलो. ज्या लोकांनी मला आंध्रला पाठवले. ‘त्यांना’ जो पराभव पत्करावा लागला, तो अजूनपर्यंत आहे. असे होते. पण आपण आपले काम प्रामाणिकपणे करत राहिले पाहिजे, असेही शिंदे म्हणाले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.