
Central Government : खरीप पिकांच्या एमएसपीमध्ये वाढ केल्यानंतर मोदी सरकारने ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या दरात बदल केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोदी सरकारने पुढील हंगामासाठी उसाच्या रास्त आणि किफायतशीर भावात वाढ करण्याचा निर्णय घेतला.
मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीने २०२३-२४ हंगामासाठी उसाच्या एफआरपीमध्ये प्रति क्विंटल १० रुपयांची वाढ जाहीर केली आहे. उसाची नवीन एफआरपी आता ३१५ रुपये प्रतिक्विंटल झाली आहे.
मंत्रिमंडळ बैठकीत झालेल्या निर्णयांची माहिती देताना माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की, मोदी सरकारने ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी उसाच्या एफआरपीमध्ये प्रति क्विंटल १० रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
उसावर एफआरपी अर्थात वाजवी आणि योग्य किंमत ठरवून, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाची हमीभाव रक्कम दिली जाते. यंदाचा उसाचा हंगाम आॅक्टोबर महिन्यापासून सुरू होणार असल्याचे ठाकूर म्हणाले.
उसाची एफआरपी वाढवण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयाचा फायदा ५ कोटी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना होणार असल्याची माहिती देण्यात आली.
यासोबतच ऊस कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या ५ लाख कर्मचाऱ्यांना आणि संबंधित कामांनाही या निर्णयाचा फायदा होणार असल्याचे सांगण्यात आले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.