Kolhapur Rain: कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरणाचे चार दरवाजे उघडले, नदी काठच्या गावांना इशारा

Radhanagari Dam Gates Opened: पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. धरणाचे स्वयंचलित ३, ४, ५ आणि ६ असे एकूण ४ दरवाज्यातून विसर्ग सुरू आहे.
Radhanagari Dam
Radhanagari DamAgrowon
Published on
Updated on

Kolhapur Rain Update : कोल्हापूर जिल्ह्यात होत असलेल्या पावसाने आज सकाळी राधानगरी धरणाचे ४ स्वयंचलीत दरवाजे उघडले. आज सकाळी ८ वाजून १५ मिनीटांनी पूर्ण क्षमतेने धरण भरले. यानंतर ८ वाजून ४० मिनीटांनी धरणाचा ५ आणि ६ नंबरचा असे दोन स्वयंचलित दरवाजे उघडले आहेत. यानंतर अवघ्या तासाभरात आणखी दोन दरवाजे उघडल्याने धरणाच्या स्वयंचलित ३, ४, ५ आणि ६ अशा एकूण ४ दरवाज्यातून विसर्ग सुरू आहे.

सध्या धरणातून ७११२ क्युसेक पाण्याचा विसर्ग होत असल्याची माहिती पाटबंधारे विभागाने दिली. दरम्यान घाटमाथ्यासह जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला असला तरी पंचगंगेच्या पाणी पातळीत किंचीत वाढ होण्याची शक्यता आहे.

राधानगरी धरणाचे पाणी कुंभी, कासारी या नद्यांच्यानंतर पंचगंगा नदीत पात्रात येते. यामुळे पंचगंगेची पातळी वाढण्याची शक्यता आहे. धरणातून विसर्ग सुरू झाला, पावसाचा जोरही कायम राहिला; तर पाणी पातळीत सात ते आठ फुटांपर्यंत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्या दृष्टीने नागरिकांनी आतापासूनच सुरक्षितस्थळी स्थलांतरित व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले.

दरम्यान राधानगरीचे दोन स्वयंचलीत दरवाजे उघडल्याने नागरिकांमध्ये पाणी पातळी वाढणार काय याचीच चर्चा सुरू होती. पावसाचा जोर वाढल्याने पुणे-बंगळूर महामार्गावर सांगली फाटा ते कोल्हापूरच्या दिशेने येणाऱ्या सेवा मार्गावर पाणी साचले होते. यामुळे राष्ट्रीय महामार्ग बंद होणार का याबाबतही जोरदार चर्चा सुरू होती.

Radhanagari Dam
Kolhapur Flood : पंचगंगा इशारा पातळीकडे, नदीकाठच्या लोकांना स्थलांतरणाच्या सूचना

दरम्यान काल जिल्हा प्रशासनाने संभाव्य पूरबाधित २७ गावांतील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसेच पाणी वाढण्यापूर्वी पूर बाधीत गावांना स्थलांतर होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याचबरोबर कोकणाला जोडणारा महत्वाच्या कोल्हापूर-गगनबावडा मार्गावर बालिंगा पुलावरील वाहतूक दुसऱ्या दिवशीही बंदच होती.

पन्हाळा तालुक्यातील नावली पैकी धारवाडी परिसरात डोंगर खचल्याने ६० कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आल्याची माहिती देण्यात आली.कोल्हापूर जिल्ह्यातील ८० बंधारे पाण्याखाली असून, ६६ मार्ग बंद आहेत.

त्यावरील वाहतूक पर्यायी मार्गाने सुरू आहे. जिल्ह्यात गेल्या २४ तासांत पाच पक्की घरे पूर्णतः, तर १६ पक्क्या आणि ५५ कच्च्या घरांची अंशत: पडझड झाल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून माहिती देण्यात आली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com