
बिद्री, जि. कोल्हापूर : काळम्मावाडी धरणाच्या (Dam) उजव्या कालव्याला गेले वीस दिवस पाणी नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान (Crop Loss) होत आहे. पाण्याअभावी पिके करपू लागली आहेत.
अन्य शेतीकामे खोळंबली आहेत. त्यामुळे तत्काळ पाणी सोडावे व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई (Help) मिळावी, या मागणीसाठी बोरवडे, बिद्री, उंदरवाडी परिसरातील शेतकऱ्यांतर्फे मुदाळतिट्टा येथे बांधकाम सुरू असलेल्या पुलावरच निषेध आंदोलन करण्यात आले.
माजी जिल्हा परिषद सदस्य मनोज फराकटे या वेळी म्हणाले, ‘‘पुलाचे बांधकाम सुरू करताना संबंधित विभागाने पाण्याचे व वाहतुकीचे नियोजन करणे गरजेचे होते."
"शेतकऱ्यांनी कष्टाने घाम गाळून हजारो रुपये मशागत, बि-बियाण्यांवर खर्च केले आहेत. पाण्याअभावी हा खर्च वाया गेला आहे. कॅनॉलला (Canal) लवकरात लवकर पाणी सोडावे, अन्यथा मुदाळतिट्टा येथे मोठे जनआंदोलन उभा केले जाईल.’’
या आंदोलनात सरपंच पांडुरंग चौगले, उपसरपंच आनंदा पाटील, बोरवडेचे उपसरपंच विनोद वारके, मारुती पाटील, राजेंद्र चौगले, तानाजी साठे, के. के. फराकटे, बाळासाहेब बलुगडे, अण्णासो पोवार, बाळासाहेब फराकटे, दत्तात्रेय पाटील, निवृत्ती साठे, जोतिराम साठे, स्वप्नील फराकटे, दत्तात्रेय चांदेकर, राजेंद्र जाधव, निवास चव्हाण, अमोल गुरव, शेतकरी उपस्थित होते.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.