Nashik DCC Bank : शेतकरी म्हणतात सरकार कुठं आमच्या पाठीशी?

Nashik Farmer Protest : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची सक्तीची वसुली तत्काळ थांबवावी व राज्य सरकारने थकबाकीदार शेतकऱ्यांची कर्जाची हमी घेऊन शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावे यांसह प्रमुख मागण्यांसाठी १ जूनपासून धरणे आंदोलन व उपोषण सुरू आहे.
Farmer Protets
Farmer ProtetsAgrowon

Nashik News : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची सक्तीची वसुली तत्काळ थांबवावी व राज्य सरकारने थकबाकीदार शेतकऱ्यांची कर्जाची हमी घेऊन शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावे यांसह प्रमुख मागण्यांसाठी १ जूनपासून धरणे आंदोलन व उपोषण सुरू आहे.

महिना उलटूनही राज्य शासनाने दखल न घेतल्याने २० जुलैपासून शेतकरी संघर्ष संघटनेतर्फे अन्नत्याग आंदोलन सुरू करणार असल्याची माहिती समन्वय समितीचे अध्यक्ष भगवान बोराडे,सुधाकर मोगल आदींनी केली. ‘सरकार म्हणते आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी, पण इथे कुठे आहे आमच्या पाठीशी?’ असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.

Farmer Protets
Nashik DCC Bank : दहा लाखांवर कर्ज थकलेल्या थकबाकीदारांवर कारवाई

पालकमंत्री दादा भुसे यांच्या घरावर १६ जानेवारीला बिऱ्हाड मोर्चा काढण्यात आला होता. त्यावेळी मागण्यांचे निवेदन दिले होते. परंतु सहा महिने उलटूनही अद्याप कार्यवाही झालेली नाही. बॅंकेचे संचालक मंडळ, तसेच श्रीमंत शेतकरी यांची वसुली आधी करा, मगच शेतकऱ्यांची करा, या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी विविध शेतकरी संघटनांकडून संघर्ष सुरू केला आहे.

Farmer Protets
Nashik DCC Bank : आमचा शेतीमाल घ्या; कर्जाच्या जाचातून मुक्त करा

जिल्हा बँकेच्या थकीत कर्जाच्या नोटिसा गोदावरी नदीपात्रात बुडवून सुरू केलेले आंदोलन, धरणे उपोषण यापूर्वी केले आहे.

आंदोलनाला आजपर्यंत रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष माजी मंत्री सदाभाऊ खोत, शिवसेना शेतकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष धनंजय जाधव,‘एमआयएम’चे जावेद अहमद मुंशी मुख्तार शेख, फरहान सैयद, सुल्तान सैय्यद, रयत क्रांतीचे प्रदेशाध्यक्ष दीपक पगार, शिवनाथ जाधव, वाल्मीक सांगळे आदींनी भेट देऊन पाठिंबा दिला आहे.१ जूनपासून उपोषण आंदोलन सुरू केलेले आहे. या आंदोलनाला जिल्ह्यातील शेतकरी पाठिंबा देत असले तरी शासनाने दखल घेतलेली नव्हती. त्यानंतर १४ जूनला विभागीय सहनिबंधक कार्यालय तथा जिल्हा बॅंकेसमोर धडक मोर्चा काढण्याचा प्रयत्न देखील झाला.

२० जुलैपासून आंदोलक करणार अन्नत्याग...

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची याबाबत २१ जूनला पुणे येथे भेट झाली होती.तेव्हा ठाकरे यांनी सहकारमंत्री अतुल सावे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून वसुली स्थगित करणार असल्याचे सांगितले होते.

प्रत्यक्षात बॅंकेकडून वसुली सुरू आहे. शेतकऱ्यांचे एक महिना ८ दिवसांपासून सुरू असलेल्या या आंदोलनाची शासनाकडून अद्याप दखल घेण्यात आलेली नाही. त्यामुळे २० जुलैपासून अन्नत्याग आंदोलनास प्रारंभ केला जाणार असल्याचे बोराडे यांनी सांगितले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com