
लवंग, जि. सोलापूर ः राज्य सरकारने राज्यातील सर्वच धरणांवरील कालवा सल्लागार समितीची (Canal Advisory Committee) पुनर्रचना केली आहे. त्यानुसार नीरेच्या पाण्यासाठीही (Nira Water) समिती नेमली आहे. पण या नवीन समितीने रब्बी हंगामाचे (Rabi Season) पाण्याचे पहिले आवर्तन सोडण्याचा अद्याप निर्णय घेतला नसल्याने माळशिरस तालुक्यातील नीरा उजवा कालव्यावरील शेतकरी पिके पाण्याला आली असल्याने पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी करत आहेत.
पावसाळा संपून महिना झाला आहे. पिके पाण्याला आली आहेत. परंतु नीरा उजवा कालव्यातून अद्याप जलसंपदा विभागाचा पाणी सोडण्याचा निर्णय झाला नसल्याने शेतकरी कालव्याला पाणी कधी येणार असा प्रश्न करीत आहेत. शेतकऱ्यांना गहू, हरभरा, मका पिकांची पेरणी चालू करायची आहे. विहीर, बोअर वरील शेतकऱ्यांनी पेरण्या चालू केल्या आहेत.
परंतु निव्वळ कालव्याच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना पेरण्या करता येत नसल्याने पाणी कधी येणार याकडे लक्ष लागले आहे. पुणे जिल्ह्यातील देवघर आणि भाटघर तर सातारा जिल्ह्यातील वीर धरणाचे पाणी नीरा उजवा कालव्यातून सातारा जिल्ह्यातील फलटणसह सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस, पंढरपूर, सांगोला या तालुक्यांना मिळते.
त्यामुळे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे या कालवा सल्लागार समितीचे सहअध्यक्ष असणार आहेत. या पुनर्रचनेत शिफारस केलेले शेतकऱ्याचे सदस्यत्व कमी करून समितीमधील पूर्वीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये कुठलेही बदल केले नाहीत. पण पाण्याबाबत निर्णय न झाल्याने शेतकऱ्यांचे डोळे त्याकडे लागले आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.