
ईट, जि. उस्मानाबाद : येथील पर्जन्यमापक यंत्र (Rain Gauge) मागील अनेक दिवसापासून नादुरुस्त असल्याने ते पावसाची अचूक नोंद (Rain Data) करत नाही. म्हणून परिसरातील शेतकऱ्यांनी तलाठी, मंडळ अधिकारी कार्यालयालगत असलेल्या पर्जन्यमापक यंत्रणा (Rain Gauge System) पुष्पहार घालून गांधीगिरीने सोमवारी (ता.१२) आपला रोष व्यक्त केला.
सोमवारी सकाळी १० वाजता बँड पथकासह वाजत गाजत जाऊन गांधीगिरी पद्धतीने हे आंदोलन केले. या वर्षीच्या पावसाळ्यात तीन ते चार वेळा ईट मंडळात ६५ मिमी पेक्षा जास्त पाऊस पडलेला असतानाही उंटावरून शेळ्या हाकणाऱ्या यंत्रणेने अंदाजे काहीही अकडे दाखवून ईट मंडळातील १२००० ते १३००० हजार शेतकऱ्यांना विमा व अनुदानापासून वंचीत ठेवल्याचा आरोप येथील शेतकऱ्यांनी केला आहे.
सतत पडणाऱ्या पावसाचे चुकीचे आकडे दाखवल्यामुळे ईट मंडळातील १९ गावातील शेतकरी या वर्षीच्या अनुदानापासून वंचित राहिले आहेत. या आंदोलनामध्ये केशव चव्हाण, संदीपान कोकाटे, अनंत डोके, प्रसाद सातपुते, रामराजे देशमुख, संपत देशमुख, संजय हुंबे यांनी सहभाग नोंदविला.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.