Water Shortage : पंचनद्यांचा वाडा कोरडाच

वाडा तालुक्याला पंचनद्यांचे वरदान लाभले आहे. असे असतानाही पाण्याबाबत योग्य नियोजन केले जात नसल्याने या नद्यांचा लाभ शेतकऱ्यांना होत नाही.
Water Shortage
Water Shortage Agrowon

Wada News वाडा तालुक्याला पंचनद्यांचे वरदान लाभले आहे. असे असतानाही पाण्याबाबत योग्य नियोजन (Water Management) केले जात नसल्याने या नद्यांचा लाभ शेतकऱ्यांना होत नाही. तालुका हिरवागार करायचा असेल, तर या तालुक्यात असलेल्या पाचही नद्यांवर १० किलोमीटर अंतरावर मोठे बंधारे बांधण्याची गरज आहे. यासंदर्भात वाडा पंचायत समिती पाटबंधारे विभागाच्या उपअभियंता राजकौर पाटील यांनी या विषयावर बोलण्यास नकार दिला.

Water Shortage
Water Shortage : संभाव्य टंचाई रोखण्यासाठी सूक्ष्म नियोजन करा

तानसा, वैतरणा, पिंजाळ, देहर्जे व गारगावी या बारमाही वाहणाऱ्या नद्या वाडा तालुक्यातून जातात; मात्र त्यांचे पाणी अडवले जात नसल्याने ते वाया जाते.

तालुक्यामध्ये गेल्या दहा-पंधरा वर्षांत जलसंधारण योजनेअंतर्गत जिल्हा परिषद पाटबंधारे विभागाकडून काही कोटी रुपये खर्च करून शिलोत्तर, बेरशेती, गोऱ्हे, तेल्याखडक, वसुरी बु., चांबळे, उचाट, मेट, आलमान, पीक, गुहीर, सांगे, पोशेरी, कोनसई, गातेस येथे कोकण पद्धतीचे बंधारे बांधले आहेत. यामधील काही बंधाऱ्यांचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने फेब्रुवारीअखेरपर्यंत हे बंधारे कोरडे पडत असतात.

Water Shortage
Water Shortage In Jalgaon : जळगावात जलसाठ्यात होऊ लागली झपाट्याने घट

तालुक्यातील शेती ओस

वाडा तालुक्याला भाताचे कोठार म्हणून ओळखले जाते. भातपिकानंतर रब्बी शेती केली जाते. एवढेच नव्हे, तर आता येथील शेतकरी आधुनिक पद्धतीने शेती करीत आहेत.

वैतरणा व पिंजाळ नदीवर अनेक बंधारे बांधल्याने या नद्यांना पाणीच पाणी दिसून येते आहे; मात्र तानसा नदीवर जास्त बंधारे नसल्याने किंवा करण्यात आलेले बंधारे निकृष्ट दर्जाचे झाल्याने या नदी किनाऱ्यावरील शेतकऱ्यांना पाण्याअभावी शेती करता येत नाही.

वाडा तालुक्याला चार नद्या असल्यातरी उन्हाळ्यात शेतीसाठी पाण्याचा प्रश्न भेडसावतो. आमच्या कार्यालयाकडून वाडा तालुक्यात एकाही नदीवर बंधाऱ्याचे काम या वर्षी सुरू झालेले नाही.

- अमित पारधे, शाखा अभियंता, पाटबंधारे विभाग ठाणे

वाडा तालुका हा शेतीप्रधान तालुका आहे. येथील वाडा कोलम, कडधान्ये ही राज्यभर प्रसिद्ध आहेत. पाच नद्या या तालुक्याला लाभल्या आहेत; मात्र सिंचनाच्या दृष्टीने पाहिले तर सर्वच राजकीय पक्ष व प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहिलेले नाही. सिंचन क्षेत्र वाढवणे गरजेचे आहे.

- श्रीकांत भोईर, सामाजिक कार्यकर्ते

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com