
Devotion Inam land : देशातील अनेक राज्यांत इनाम जमिनी कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावे करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रातही असाच कायदा करून देवस्थान इमान जमिनी कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावे कराव्यात यासह विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभेकडून कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात दिलेल्या माहितीनुसार, देवस्थान इनाम जमिनी कसणाऱ्या शेतकन्यांच्या नावे कराव्यात, देवस्थान जमीन अधिकार अभिलेखात कसणाऱ्या शेतकऱ्यांची नावे पूर्वीप्रमाणे समाविष्ट करावीत, तसेच वारसांची नोंद करावी, यामागणीसाठी किसान सभेच्यावतीने २०२३ मध्ये अकोले ते लोणी, नाशिक मुंबई असे दोन लाँग मार्च काढले होते.
तेव्हा तत्कालीन महसूलमंत्र्यांनी देवस्थान समितीच्या जमिनीबाबत कायदे करण्याचे आश्वासन दिले होते. देवस्थान जमिनी गेली अनेक वर्षे शेतकरी कसत आहेत, त्यांनीच जमिनीची उत्पादकता टिकवून ठेवली आहे. मात्र याच शेतकऱ्यांची सातबाऱ्यावरील नावे कमी झाल्याने शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळत नाही.
देवस्थान समितीकडून खंड भरून घेण्यास टाळाटाळ केली जाते. जमिनीचे लिलाव लावल्यामुळे स्थानिक पातळीवर भीतीचे वातावरण तयार होते. नूल (ता. गडहिंग्लज) येथे अशा शेतकऱ्यांना कोणतीही नोटीस न देता त्यांची नावे सातबाऱ्यावरून कमी करण्यात आली आहेत. यामुळे शेतीतून अपेक्षित उत्पन्न मिळणे मुश्कील झाले आहे.
अशा अनेक समस्या खंडकरी शेतकऱ्यांच्या समोर आहेत. त्यावर लवकरात लवकर निर्णय घेण्यात यावा या मागणीसाठी डॉ. उदय नारकर, नारायण गायकवाड, राम कळंबेकर, भीमराव देसाई आदींनी हे निवेदन दिले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.