sandeep Shirguppe
कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्याच्या करनूर गावातील सतीश सांगावकर यांनी ऊस आणि त्यात सुमारे पाच आंतरपिके घेत वेगळाच पॅटर्न दहा वर्षांपासून कायम ठेवला आहे.
कोल्हापूर- बंगळूर महामार्गानजीक कोगनोळी टोल नाक्याजवळ करनूर (ता. कागल, जि. कोल्हापूर) हे गाव आहे. प्रामुख्याने ते ऊस शेतीसाठी प्रसिद्घ आहे.
सतीश सांगावकर यांनी आपल्या नऊ एकर शेतीत सुमारे सहा एकर क्षेत्रावर उस पीक घेतता. यात तीन एकर लागवडीचा ऊस तर तीन एकरांत त्याचा खोडवा असतो.
सतीश हे जूनच्या मध्यावधीनंतर ते जुलैच्या पहिल्या आठवड्यात भुईमूग, मिरची आदींची लागवड बोदावर करतात. ऑगस्टमध्ये उसाची लागवड करतात. तोपर्यंत आंतरपिकांची वाढ सुरू झालेली असते.
मिरचीच्या मधल्या तीन फूट जागेत कमी कालावधीतील पालेभाज्या उदा. पालक, कोथिंबीर व जोडीला काही प्रमाणात झेंडू अशी जवळपास ४ ते ५ आंतरपिके घेतात.
आंतरपिकांच्या लागवडीपूर्वी मिरची व भुईमुगासाठी सिंगल सुपर फॉस्फेट, १०. २६. २६. तर ऊस लागवडीवेळी डीएपी, पोटॅश, युरिया आदींचा प्रत्येकी एकरी सत्तर किलो प्रमाणात ते वापरतात.
पूर्वी सतीश वेलवर्गीय पिके घ्यायचे. मात्र त्यात मजूरसंख्या जास्त लागायची. त्या तुलनेत कमी मजूरबळ असलेल्या काही पिकांची निवड त्यांनी केली.
उसाच्या खोडव्यातही उन्हाळी सोयाबीनचा प्रयोग सतीश दहा वर्षांपासून करीत आहेत. ऊस तुटल्यानंतर पाचट बारीक करून ते एकसारखे पसरविले जाते.
दरवर्षी या सोयाबीनचे सहा ते सात क्विंटल उत्पादन घेण्यात यशस्वी झाल्याचे सतीश सांगतात. खरिपातही जागेच्या उपलब्धतेनुसार उसात आंतरपीक म्हणून बोदावर सोयाबीन घेतल्याची माहिती सतीश यांनी दिली.
सतीश ‘ॲग्रोवन’चे नियमित वाचक आहेत. त्यातील सर्व माहिती-ज्ञानाचा वापर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. याचबरोबर त्यांच्या पत्नीचाही मोठा वाटा असल्याचे त्यांनी सांगितलं.