Farmers Protest : शेतकरी आंदोलनावर दिल्लीत नऊ फेब्रुवारीला निर्णय ः टिकैत
नागपूर : ‘‘केंद्र सरकारने शेतकरी आंदोलन (Farmers Protest) मागे घेताना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केली नाही. त्या पार्श्वभूमीवर गुरुवारी (ता. २६) बैठकीत पुन्हा आंदोलनाचा निर्णय घेण्यात येणार होता.
मात्र आता याबाबत ९ फेब्रुवारी रोजी दिल्लीतील बैठकीत निर्णय होईल,’’ अशी माहिती भारतीय किसान युनियनचे (Bhartiy Kisan Union) समन्वयक राकेश टिकैत (Rakesh Tikait) यांनी दिली.
टिकैत म्हणाले, ‘‘हमीभावाचा कायदा (MSP Act) त्यासोबतच इतर अनेक मुद्द्यांवर शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमेवर तब्बल वर्षभर आंदोलन केले होते.
त्या वेळी केंद्र सरकारने मागण्यांची पूर्तता करण्याचे आश्वासन दिले. मात्र एकाही आश्वासनाची पूर्तता केंद्र सरकारने केलेली नाही.
त्यामुळे शेतकरी संघटनांमध्ये रोष आहे. परिणामी, शेतकरी संघटना पुन्हा एकदा आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत.
९ फेब्रुवारी रोजी दिल्लीत एकत्र बैठकीत आंदोलनाच्या मुद्द्यावर चर्चा होईल. तसेच १५ ते २२ फेब्रुवारी दरम्यान दिल्लीतच या मुद्द्यावर पंचायत बोलाविली जाईल.’’
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.